Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 7

2023-04-06 11:02:07
188 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-06 11:02:06 ६ एप्रिल इ.स.१८१७
बाजीराव पेशव्याने (दुसरे) इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली. एल्फिन्स्टनने त्यावर कठोरपणे सांगितले की एक महिन्याचे आत तुम्ही त्रिंबकजीस पकडून आणून आमचे स्वाधीन करा आणि तोपर्यन्त जामीन म्हणून तुमचे चार किल्ले रायगड, पुरंदर, सिंहगड व त्रिंबक आमचे ताब्यात द्या. या डरावणीने बाजीराव अगदी घाबरून गेला.



६ एप्रिल इ.स.१८४९
कोहिनूर आणि दुलीपसिंग यांची इंग्लंडला रवानगी
रणजितसिंग २७ जून १८३९ रोजी लाहोर इथे मरण पावला. त्याच्या वारसांमध्ये पण हाणामाऱ्या, कट, कारस्थाने होऊन त्याचा सगळ्यात धाकटा मुलगा दुलीपसिंग जो त्यावेळी ( सप्टेंबर १८४३ ) मध्ये अवघ्या पाच वर्षांचा होता, सिंहासनारूढ झाला. मार्च १८३९ मध्ये इंग्रजांनी अन्य भारतीय संस्थानांसारखे शीख साम्राज्य पण खालसा केले. त्यांनी ज्या प्रमाणे पेशवाईचा पाडाव झाल्यांनतर अल्पवयीन प्रतापसिंह महाराजांना नव्याने निर्माण केलेल्या सातारा राज्यावर बसवून( एप्रिल १८१८ ) त्यांच्या मार्गदर्शनासाठी कॅ.जेम्स ग्रांट ची नियुक्ती केली होती त्या प्रमाणेच दुलीपसिंगसाठी इंग्रजांनी डॉ. लोगिनला लाहोर दरबारी नियुक्त केले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसीच्या हुकुमानुसार इंग्रजांनी कोहीनुरसहित रणजितसिंगाचा सर्व शाही खजिना ताब्यात घेतला. कोहिनूर घेऊन दस्तुरखुद्द डलहौसी मुंबईस आला व कोहिनूर आणि दुलीपसिंग ह्या दोघांची ६ एप्रिल १८४९ ला बोटीने इंग्लंडला रवानगी केली. ज्याप्रमाणे पुण्यश्लोक शाहू महाराज औरंगजेबच्या कुटुंबीयात राहिले होते तद्वतच दुलीपसिंग विक्टोरिया राणीच्या सहवासात बराच काळ राहिला. इ.स.१८५१ मध्ये ज्यावेळी त्याने कोहिनूर हिरा प्रथमच पाहिला होता, विक्टोरिया राणीस भेट म्हणून देऊन टाकला. तेहापासून कोहिनूर तेथील राण्यांच्या मुगुटामध्ये विराजमान आहे. कोहिनूर पुरुषांना लाभत नसल्याच्या भीतीने राजघराण्यातील पुरुष मंडळींनी तो कधी परिधान केला नाही.





६ एप्रिल इ.स.१९२७
सरफरोशी की तमन्ना
काकोरी दरोडा प्रकरणातील सर्व क्रांतिकारी दोन गाड्यांनी कोर्टात आणले गेले. ते देशभक्तीपर गाणी गात असत. घोषणा देत असत. लोकांची भरपूर गर्दी होत असे. ६ एप्रिल १९२७ रोजी ‘सरफरोशी की तमन्ना’ हे गाणे म्हणत सर्वजण कोर्टात शिरले. जस्टिस हॅमिल्टनने शिक्षा सुनावल्या. पंडीत रामप्रसाद ‘बिस्मिल’, राजेंद्र लाहिरी, ठाकूर रोशनसिंग, आणि अश्कफुल्ला खान ह्यांना फाशी झाली. अनेकांना जन्मठेप, १४-१०-७-५-४-३ वर्षांचे सश्रम कारावास झाले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
175 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-06 11:02:06 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

६ एप्रिल इ.स.१६६३
( चैत्र शुद्ध नवमी, शके १५८५, संवत्सर शोभन, सोमवार )

हल्ल्यानंतर महाराज सिंहगडावर दाखल :-
शाहिस्तेखानाची ३ बोटे छाटली व त्याच्या छावणीत पुर्ण हलकल्लोळ माजवून महाराज सहीसलामत किल्ले सिंहगडी दाखल राजे सिंहगडी सुरक्षित पोहोचले होते. तेव्हा पहाट होत होती. सुर्यनारायणाची आभा पसरत होती. आणि महाराजांच्या हेरांनी सकाळी गडावर बातमी आणली, "खान मेला नाही त्याची फक्त ३ बोटे उडाली". महाराजांना ही बातमी कळली. महाराजांनी स्मितहास्य केले व म्हणाले, "शाहिस्तेखानास शास्त झाली, पातशहाने नाव ठेवले, परंतु यथार्थ ठेवले नाही ते नाव आपण शास्त करून रुजू केले, परमेश्वराने हे अचाट साहस आपणास करावयास लावले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link



६ एप्रिल इ.स.१६६५
इ.स. १६६५ एप्रिल ६ पोर्तूगीज व्हाईसरायचे पत्र - "शिवाजीराजे कानडा प्रांतांतून गोव्याकडे येणारा तांदूळ ताब्यांत घेण्यासाठीं तुमचीं ९ जहाजे मुरगांव बंदराकडे आली व परत जाऊ लागलीं. त्यामुळे आम्हास कांही लढाऊ जहाजे तेथे पाठविणे भाग पडले. त्यांनी तुमची जहाजें धरुन आणूंन बंदरांत ठेवली. परंतु तुमच्या स्नेहसबंधाकडे लक्ष देऊन मीं तीं जहाजें जाळण्याचा हूकूम न सोडतां परत जाण्यास मोकळीक दिली."



६ एप्रिल १६६६ :-
( चैत्र शुद्ध द्वादशी, शके १५८८, संवत्सर पराभव, शुक्रवार )

राजे दिल्ली जवळ करीत होते :-
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगाबाद सोडले व महाराजांच्या पुढच्या प्रस्थानाची बातमी देण्यासाठी वकील म्हणून रघुनाथपंत कोरडे दिल्लीस रवाना झाले. महाराज आग्रा प्रवासात असताना त्यांना औरंगजेबाचे पत्र मिळाले. त्यात औरंग्याने, "मिर्झाराजे जयसिंग यांनी ठरवल्याप्रमाणे तुम्ही इकडील प्रांती रवाना झाले ते पाहून संतोष झाला. ऐशीयास इकडील पुर्ण लोभ तुम्हांवर आहे. म्हणोन अदकार न करता खातरजमेने दरमजल करत निघोन यावे. भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल. सांप्रत तुम्हाकरीता पोशाख पाठवत आहे. तो घ्यावा". "भेटी अंती बहुत सत्कार पाहून माघारे जाण्याविषयी निरोप दिला जाईल". हे औरंगजेबाचे लेखी वचन पाहून महाराजांचा उत्साह व अपेक्षा निश्चितच उंचावल्या.



६ एप्रिल इ.स.१६८२
(चैत्र शुद्ध नवमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार गुरुवार)

खडगगडाचे किल्लेदार बादशहाच्या सेवेत रुजू!
खडगगडाचे किल्लेदार (अंकाई) आणि खडगगडाच्या प्रदेशातील नामांकित जमीनदार, सावकार, चिमणजी प्रभू बादशाही सेवेत रूजू झाले. महाराजांच्या महानिर्वाणानंतर फितुरांची स्पर्धाच लागली होती. वतनासाठी लाचार होऊन मुसलमानी सत्ताकर्ते फेकतील ती हाडके घेऊन चघळण्यात धन्यता मानणार्‍यांची अहमिका लागली होती! बादशहातर्फे चिमणाजी प्रभू यांना मोठी खिलजीची वस्त्रे देऊन गौरविण्यात आले.





६ एप्रिल इ.स.१७८२
अहमदखानाचे व नजफखानाचे वाकडे होते. त्यामुळे बादशहा शहाअलम हा आपला वजीर नजफखान याच्या वर्चस्वास कंटाळला. शहाअलम बादशहा हा मराठ्यांच्या मर्जीने रहाण्यास उत्सुक होता आणि वारंवार तो बोलून दाखवी की, महादजी शिंदे किंवा हरिपंत फडके यासारखा एक फौजबंद मराठा सरदार सतत दिल्लीस रहावा आणि मराठ्यांनी बादशहास दरमहा २ लक्ष रुपये देऊन करोडीची स्थळे हस्तगत करावी. ही परिस्थिती सन १७८० मध्ये होती. परंतु यावेळी मराठे व इंग्रज यामध्ये नेकीने युद्ध चालू असल्यामुळे मराठ्यास हे कार्य पत्करणे शक्य नव्हते. दिनांक ६ एप्रिल १७८२ रोजी नजफखान मृत्यू पावला. आणि पुढील महिन्यात सालबाईचा तह पुरा होऊन पहिले इंग्रज मराठे युद्ध थांबले. तेव्हा महादजी शिंदे यांना दिल्लीच्या राजकारणाकडे लक्ष पुरवण्यास अवसर मिळाला. बादशहास सन १७७२ त दिल्लीस आणून तख्तनशीन केल्यावेळे पासून महादजी शिंद्यांच्या मनात दिल्लीचा कारभार आपल्या ताब्यात घ्यावा असे होते पण वर सांगितल्याप्रमाणे सालबाई तहापर्यंत महादजींना दिल्लीच्या राजकारणाकड पहाण्यास फुरसत नव्हती. ह्या संधीचा फायदा मिझ नजफखान याने घेतला. पण मिझ नजफ ६ एप्रिल १७८२ मध्ये निर्वतल्यानंतर दिल्लीच्या बादशहाने महादजीस दिल्लीचा कारभार हाती घेण्याची विनंती केली. बादशहा शहाअलम महादजींना दिल्लीस आणण्यास एवढा उतावीळ झाला की, त्याने त्यावेळी दिल्ली दरबारी असलेले मराठ्यांचे वकील हिंगणे यास महादजीस दिल्लीस येण्यास आवर्जून लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे हिंगणे यांनी पाटील बावांस लिहिले, “ही वेळ अशी आहे की, इकडे येण्याने तुम्हाला कीर्तीच नव्हे तर पैसाही मिळेल.”

136 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-05 11:02:26
203 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-05 11:02:20 ५ एप्रिल इ.स.१७७८
महादजी शिंद्याचे छत्रपतींविरुद्ध आक्रमण आणि तह
कोल्हापूरच्या छत्रपतींचे पारिपत्य करण्यासाठी पेशव्यांनी त्यांचे सरदार महादजी शिंद्यास पाठवले. तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले. ५ एप्रिल १७७८ रोजी तह झाला. तहानुसार छत्रपतींनी महादजीस वीस लाख रुपये खंडणी म्हणून द्यावे लागले व कोल्हापूरच्या फौजेने पकडलेली महादजीची माणसे सोडून द्यावी लागली.



५ एप्रिल इ.स.१८२२
सातारा राज्याचे छत्रपती प्रतापसिंह
एप्रिल १८१८ ला प्रतापसिंह यांची सातारा राज्याच्या गादीवर पुनःस्थापना झाली तरी त्यांचा बरोबर तह २५ सप्टेंबर १८१९ मध्ये झाला. कारण तोपर्यंत बाजीराव इंग्रजांना शरण आला नव्हता व त्याचा पूर्ण बंदोबस्त केल्यावरच इंग्रज सातारच्या महाराजांकडे लक्ष देणार होते. कंपनी सरकारतर्फे जेम्स ग्रांट तर महाराजांतर्फे त्यांचा मुखत्यार-पॉवर ऑफ अटर्नी-विठ्ठल बल्लाळ फडणीस ने सह्या केल्या. जेम्स ग्रांटने राज्यकारभाराच्या दृष्टीने परिपूर्ण सातारा राज्य ५ एप्रिल १८२२ महाराजांच्या हाती सोपविले. हे राज्य त्यानंतर सुमारे २६ वर्षे अस्तित्वात राहिले. ५ एप्रिल १८४८ ला आप्पासाहेबांच्या मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.



५ एप्रिल इ.स.१८४८
छत्रपती आप्पासाहेब यांचा मृत्यू (सातारा गादी)
धाकटे शाहूमहाराज उर्फ आबासाहेब ह्यांना तीन मुलगे होते. सर्वात वडील प्रतापसिंह उर्फ बुवासाहेब, द्वितीय रामचंद्र उर्फ भाऊसाहेब आणि तृतीय अप्पासाहेब उर्फ शहाजी.
धाकटे शाहूमहाराज इ.स.१८०८ मध्ये मृत्यू पावल्या नंतर त्यांचा वडील मुलगा प्रतापसिंह छत्रपती बनला. ते इंग्रजांनी पदच्युत करेपर्यंत म्हणजे ५ सप्टेंबर १८३९ पर्यंत छत्रपतीपदी विराजमान राहिले. त्यांच्या नंतर अप्पासाहेब उर्फ शहाजी ह्यांना इंग्रजांनी १८ नोवेंबर १८३९ ला सातारा गादीवर बसवले. अप्पासाहेब ५ एप्रिल १८४८ रोजी मरण पावले. मृत्यूनंतर सातारा राज्य इंग्रजांनी खालसा केले.





५ एप्रिल इ.स.१८६३
छत्रपती चौथे शिवाजी महाराज कोल्हापूर संस्थान यांचा जन्म (करवीर राज्य)
दुसरे छत्रपती राजाराम महाराजांच्या अकाली निधनानंतर करविर गादीवर ८ वर्षाचे नारायण दिनकरराव भोसले अर्थात छत्रपती चौथे शिवाजी महाराज छत्रपती झाले. चौथे शिवाजी महाराजांचा जन्म कोल्हापुर येथील सावर्डे येथे ५ एप्रिल १८६३ रोजी झाला. (सावर्डेकर भोसले घराण्यातून दत्तक घेतलेले) महाराज उंचपुरे रुबाबद व्यक्तीमहत्व होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
185 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-05 11:02:20 अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले...



५ एप्रिल इ.स.१६८९
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)
छत्रपती राजाराम महाराजांनी किल्ले रायगड सोडला.
दुर्गराज रायगड म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या तक्ताची जागा. गडांचा राजा व राजांचा गड, परंतु नियतीची चक्रे अकस्मात फिरली व इ.स.१६८९ पर्यंत अभेद्य व अप्राप्य वाटणारा हा हिंदवी स्वराज्याच्या राजधानीचा गड छत्रपती संभाजी महाराजांच्या म्रृत्यूनंतर मात्र हतबळ झाला. शत्रूसुद्धा जो सहजी कधी प्राप्त होईल असे वाटले नव्हते तो गड २५ मार्च इ.स.१६८९ पासून मोगली विळख्यात सापडला. रायगडचे फास आवळले जाऊ लागले. समय बाका होता, महाराणी येसुबाईसाहेब यांनी आपल्या पुत्रास मंचकारोहण करण्याचा मोह टाळून आपल्या दिरास वारसदार म्हणून मंचकारोहण करण्याच्या निःस्वार्थी व उदार निर्णयाने स्वराज्याचा वारसा हक्काचा धोका मागे पडून मोगली आक्रमणास का, कसे, कुठे व कोणी व कोणती उपाय योजना करावी यावर विचारमंथन झाले. प्राप्त परिस्थितीत रायगडावर शाहू महाराजांसह आपण वास्तव्य करण्याचा व युवराज राजाराम महाराजांनी बाहेर पडून मोगलांशी संघर्ष सुरू ठेवण्याचा सल्ला सर्व जेष्ठ की श्रेष्ठ मुत्सद्यांना व सेनांनींना पटला. त्यानुसार युवराज राजाराम महाराजांनी ताराराणीसाहेब, राजसबाईसाहेब, प्रल्हाद निराजी आदींसह गुप्तपणे रायगडाच्या वाघ दरवाज्यातून जिंजीकरीता प्रयाण केले.





५ एप्रिल इ.स.१७१८
मराठा सरखेल 'कान्होजी आंग्रे' यांच्या आरमाराला जशास तसे उत्तर देण्यासाठी सर्व तह बाजूला सारून ईस्ट इंडिया कंपनीच्या बॉम्बे कौन्सिलच्या बैठकीत आंग्र्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला.
पुढे काही दिवसांनी इंग्रजांनी आंग्र्यांचे एक शिबाड पकडले तेंव्हा आंग्र्यांनी इंग्रजांना पत्र पाठवले. "तुमची आमची मैत्री संपली. इथून पुढे देवाची कृपा होऊन माझ्या हाती जे लागेल ते घेतल्याशिवाय मी राहणार नाही."



५ एप्रिल इ.स.१७४०
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. इतर प्रांतांची व्यवस्था लावून पूर्ण झालेली होती. परंतु, तरीही बाजीराव पेशवे पुण्याला न राहता रावेरखेडीलाच राहिले. वास्तविक पुणे हे बाजीरावांचे अत्यंत प्रिय. शनिवारवाड्यासारखा बळकट महाल त्यांनी उभा केला, पुण्याची पुनर्बाधणी केली. परंतु, मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या घरातल्यांनीही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते. सतत मस्तानीच्या असण्यावरून घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले. चिमाजीआप्पांनी राधाबाईंना पत्राद्वारे रावांची प्रकृती कळवली.



५ एप्रिल इ.स.१७७०
मराठ्यांनी आग्रा व मथुरा जिंकले
तिसऱ्या पानिपत युद्धात मराठ्यांची जबरदस्त हानी झाली होती. त्याचा धक्का सहन न झाल्यामुळे नानासाहेब पेशवा लवकरच निधन पावला. त्यामुळे उत्तरेत लक्ष देता आले नाही.
१७६८ नंतर माधवरवाना उत्तरेकडे लक्ष देण्यास फुरसत मिळाली. १७६९ च्या शेवटी माधवरावांनी एक जंगी मराठा सैन्य रामचंद्र गणेश कानडे आणि विसाजी कृष्ण बिनीवाले यांच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडे रवाना केले.पानिपत युद्धातील कलंक धुवून काढणे,विश्वासघातकी नजीबला शासन करणे व उत्तरेत पुन्हा मराठ्यांचे अधिपत्य निर्माण करायचे,असे माधवराव नि ठरवले होते.त्याचा भाग म्हणून मराठ्यांनी पुन्हा उत्तरेत आपला जम बसविण्यास सुरुवात केली.महादजी शिंदे सुद्धा मोठ्या जोमाने ह्या कार्यात आघाडीवर होते.
मराठी फौजांच्या मार्गात जाट मंडळींचा अडथळा होता.पण ५ एप्रिल १७७० ह्या दिवशी मराठ्यांनी जाट सैन्याचा पराभव करून आग्रा व मथुरा हि दोन ठिकाणे काबीज करून दिल्लीकडे आगेकूच चालू ठेवली.

140 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-05 11:02:19 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

५ एप्रिल इ.स.१६६०
( वैशाख शुद्ध षष्टी, शके १५८२, संवत्सर शार्वरी, गुरुवार )

शाहिस्ते खान बारामतीला दाखल :-
शाइस्ताखान बारामतीला पोहचला. अन् मे १६६० ला तो पुण्यात पोचला. तो लाल महलात घुसल. आणि सुमारे ३ वर्ष ठाण मांडून बसला. सिद्दीच्या मगोमाग आलेला हा दुसरा गनीम लाल महलात ठाण मांडून बसला होता. तो होता औरंगजेबाचा सख्खा मामा, अमीर-उल्-उमराव नवाब-बहादुर मिर्झा अबूतालीब उर्फ शाइस्ताखान. ७७ हजार घोडदळ, ३० हजार पायदळ, हत्ती, घोडे, उंटांवरचा तोफखाना (शुत्तरनाळा), हत्तीवरचा तोफखाना (फिलनाळा), बारूद वगैरे सर्व साधने घेऊन हजारोंच्या सैन्यासह, सोबत शम्स खान पठाण, नामदार खान, गयासुद्दीन, हसन मुनीम, सुल्तान मिर्झा, मनचेहर, तुरुकताज, कुबाहत खान, हौद खान, सिद्दी फत्ते, कारतलब खान, शामसिंह, राजसिंह गौड, रामसिंह, रायसिंह सिसोदिया, दत्ताजी खंडागळे, दत्ताजी व रुस्तमराव जाधव, रंभाजी पवार, माहुरची रायबाघन व तिचे कृष्णराज, प्रचंडराज ई. भाऊ, सर्जेराव घाटगे यांसह सुमारे ५६ सरदार या मोहिमेत होते.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




५ एप्रिल इ.स.१६६३
( चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८५, संवत्सर शोभन, रविवार )

#शाहिस्तखानावर_सर्जिकल_स्ट्राईक
शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती.५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले.
तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापुजी मुदगल, चिमणाजी बापुजी मुदगल, बाजी सर्जेराव जेधे, चान्दाजी कान्होजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तान्हाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरलेमहाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धाअसेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned.
ऐन मध्यरात्र सारी छावणी सुस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले.
150 views08:02
ओपन / कमेंट
2023-04-04 17:15:04
210 views14:15
ओपन / कमेंट
2023-04-04 17:14:51 या कलमाने इंग्रजांचे झालेले नुकसान भरून दिले पाहिजे, हि गोष्ट तत्वतः व प्रत्यक्षतः शिवरायांनी स्पष्टपणे मान्य केली.
नारायण शेणव्याचा हा मोठा विजय होता. त्याने ४ एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून लिहिलेल्या पत्रात कळवले, ' येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने शिवाजी तयारी करीत आहे. सोनें, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना बोलावणी जातील. रायगडावर फार मोठ्या प्रमाणात दानधर्म होईल. आता ऑक्झेंडनबरोबर शिवाजीकरिता चांगला नजराणा पाठवा. आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान रत्ने, राज्याभिषेकसमयी धारण करण्याजोगी पाठवावीत. नजराणा हजार बाराशे रुपयांचा पाठवावा.'



४ एप्रिल इ.स.१६८३
(चैत्र वद्य तृतीया, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार बुधवार)

छत्रपती संभाजी महाराजांचा तारापूर, डहाणू व अशेरी भागावर हल्ला!
एकीकडे पोर्तुगीज छत्रपती संभाजी महाराजांशी तह करून वरवर आपले सलोख्याचे संबंध आहेत असे दाखवत होते आणि त्याच सुमारास औरंगजेबाचा एक दुत गोव्याच्या विजरईशी वाटाघाटी करण्यासाठी आला होता. अशा स्वरूपाच्या छुप्या गोष्टी कोंट-द-अल्वारे पत्ररूपाने करत असल्याचे छत्रपती संभाजी महाराजांना समजले आणि मग या विश्वासघातकी पोर्तुगिजांना चांगलाच धडा शिकविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील डहाणू, सिरीगाव (शिरगाव), असेरी (अशेरी), सैबाण (बहुधा सायवन), तारापूर या पोर्तुगीज ठाण्यावर प्रचंड हल्ला करून अनेक खेडी जाळली. छत्रपती संभाजी महाराजांच्या सैन्याने केलेल्या हल्ल्यामुळे बदला म्हणून कोंट-द-अल्वारेने छत्रपती संभाजी महाराजांचे गोव्यातील वकील येसाजी गंभीरराव यांना अटक करून नजरकैदेत ठेवले.



४ एप्रिल इ.स.१६८७
छत्रपती संभाजी महाराज मोगलांवर बाहेरून हल्ले चढविण्याकरिता व सर्वत्र रसद मारून मोगली सैन्य जेर
करण्यासाठी आपल्या सैनिकासह गोवळकोंड्याभोवती हिंडत होते. त्यांचे कर्नाटकातील सैन्यही नाकेबंदी करून राहिले होते. मच्छलीपटणचे दिनांक ४ एप्रिल १६८७ चे फोर्ट सेंट जॉर्जला लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजे १२ हजार स्वार व ५० हजार पायदळ लोकांसह गोवळकोंडा याच्या रोखाने गोवळकोंड्यापासून ४/५ दिवसांच्या मुक्कामावर आले आहेत असा मजकूर आहे. गोवळकोंड्याचा सुलतान मोगलांच्या हल्ल्याचा जोरात प्रतिकार करीत होता.



४ एप्रिल इ.स.१७०३
सिंहगडचा रणसंग्राम
४ एप्रिल१७०३ ला तर सेनापती धनाजी जाधवांचा पुत्र शम्भूसिंह जाधवने म्हलर्जी व खंडोजी च्या सोबतीने ४ हजार घोडदळ सकट इराडत खानाच्या ठाण्यावर हल्ला केला. हे ठाणे बादशाही छावणीच्या रक्षणाच्या हेतूने छावणी पासून केवळ ४ कोस दूर होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
197 views14:14
ओपन / कमेंट
2023-04-04 17:14:51 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

४ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शनिवार)

महाराजांची शाहिस्तेखानाला शास्त देण्याची तयारी!
महाराजांची महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता. तेथून ते किल्ले राजगडला परतले. सरनौबत नेतोजी राजगडी दाखल झालेले होतेच. मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेलेले होते. राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यांसमवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/d4kQAv7bnmc?feature=share

४ एप्रिल इ.स.१६७०
नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.



४ एप्रिल इ.स.१६७२
निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू !
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंतयोगी !!
दि. ४ एप्रिल १६७२ – चैत्र वद्य द्वितीया, शके १५९४ या दिवशी समर्थ रामदास स्वामींनी शिवरायांना एक ओवीबद्ध पत्र पाठवले. “निश्चयाचा माहामेरू...” अश्या शब्दांनी सुरुवात होणारी आणि शिवरायांचे गुणसंकीर्तन करणारी ही शिवप्रशस्ती अलौकिक आहे. हे काव्य मोठे आहे पण त्यातील निवडक ओव्या गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांनी आपल्या गोड गळ्याने गाऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवल्या आहेत.
आजवर अनेक प्रतिभावंतांनी शिवरायांवर स्तुतीसुमने उधळली आहेत. शिवरायांना समकालीन असलेल्या कविन्द्र परमानंद, कवि भूषण, केशवराज पंडित अश्या अनेकांनी शिवाजी महाराजांना आपल्या उत्तुंग प्रतिभेच्या शब्दसामर्थ्याने गौरविले आहे. परंतु समर्थांनी, ‘निश्चयाचा माहामेरू’ या काव्यात शिवस्तुती करताना वापरलेल्या शब्दांची ऊंची कोणालाच गाठता आलेली नाही.



४ एप्रिल इ.स.१६७४
प्रतापराव रणांगणात पडले त्या दिवशी महाशिवरात्री होती.
प्रतापराव व बहलोलखान यांच्यात झालेल्या युद्धाचे वर्णन नारायण शेणवी (इंग्रजांचा दुभाशी) हा डेप्युटी गव्हर्नर, मुंबई यांना ४ एप्रिल १६७४ रोजी लिहीलेल्या पत्रात लिहीतात.
The Rajah Sevajee intended to proceed to currall to give a new orders to his army and to creat a New generall of his horse in the rooms of pertab roy (Pratap ray) Who fell in the encounter of Sevajees army with Bullool Ckaun in a narrow passage betwixt two hills who with six horse man more were slaine, being not succored by the rest of the army, so that Bullool ckaun remains victorius. (factory records of surat)
राजे शिवाजी यांनी आपल्या फौजेला आज्ञा देण्यासाठी व नविन सरनोबत नियुक्त करण्यासाठी कुडाळ येथे जाण्याचा निर्णय घेतला त्याचे कारण असे की, सरनोबत प्रतापराव हे बहलोलखानाशी झालेल्या चकमकीत मारले गेले. ही चकमक दोन टेकड्यांच्या मधे असलेल्या अरुंद ठिकाणी (खिंडीत - नेसरीची खिंड) झाली. प्रतापरावांसोबत आणखी सहा घोडेस्वार मारले गेले. प्रतापरावांना वेळेवर सैन्याची मदत न पोहोचू शकल्याने ह्या सर्वांची कत्तल झाली. लढाईमद्धे बहेलोल खान विजयी ठरला.
प्रतापराव बहलोलखानाशी फक्त ६ घोडेस्वारांनिशी लढताना बाकीच्या सैन्याचे अभावी मारला गेला. त्याचे जागी नविन सेनापती नेमून, सैन्याला नवे हुकूम देण्यासाठी शिवाजी कुडाळला जाणार होता. परंतु प्रतापरावाचा दुय्यम आनंदराव याने धीराचे पत्र लिहिल्यामुळे शिवाजीने त्याला सेनापती पद देऊन " शत्रूचा मोड केल्याशिवाय तोंड दाखवू नये." असा हुकूम केला.



४ एप्रिल इ.स.१६७४
एप्रिल ३ रोजी दुपारी शेणवी गडावर जाऊन दरबारांत शिवाजीराजे यांस भेटला. निताजीपंत हजर होते. राजापूरची वखारीची लुट केल्याने इंग्रजांचे जें नुकसान झालें, त्यावर प्रामुख्याने बोलणी झाली. यावेळी निराजीपंताने इंग्रजांच्या या मुद्दयावर अपेक्षेबाहेर तरफदारी केली. शिवरायांच्या मनावर निराजीपंतांच्या विचारांचा परिणाम होऊन त्यांनी ताबडतोब कारकुनास हुकुम लिहिण्यास सांगितले. राजापूरच्या नुकसानीची भरपाई शिवाजीराजे यांनी तीन हप्त्यांनी करावयाची. नुकसानीच्या रकमेदाखल २५०० होन राजापूरच्या जकातीतून; २५०० होन १ सप्टेबरपासून सुरु होणाऱ्या १ ल्या वर्षी व उरलेले एकूण ५ हजार होन शिवाजीराजे यांनी पुढील दोन वर्षांत इंग्रजांस पोहोचते होण्याची व्यवस्था करावी, असें या कलमाचे स्वरूप होते.
193 views14:14
ओपन / कमेंट