Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 10

2023-03-27 19:20:53 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२७ मार्च इ.स.१६६६
औरंगजेबाचे राज्यरोहन
१६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्याचा नैतिक अधिकार औरंगजेबाला प्राप्त झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा दि. २७ मार्च १६६६ ला आग्रा येथे बादशहाचा राज्यारोहण केला. शिवराय त्यावेळी प्रवासातच होते. राज्यरोहणाच्या वेळी औरंगजेबाने आपल्या बहिणींना पुष्कळ संपत्ती दिली.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२७ मार्च इ.स.१६६७
मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी अन् त्यांचे चुलते कोंडाजी यांना २४ ऑक्टोबर १६६६ रोजी अटक केली होती. दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजींनी धर्मांतरास मान्यता दिली. आजच्या दिवशी नेताजी पालकरांचे औरंगजेबाकडून धर्मांतर झाले. नेताजी पालकरांचे ‘मुहंमद कुलीखान’ असे नामकरण करण्यात आले.
जून १६६७ ला औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी पालकर यांना काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना करण्यात आले, लाहोरजवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला. पुढे ९ वर्षे नेतोजी काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला 'प्रतिशिवाजीची' आठवण झाली. बाटून ९ वर्षे उलटल्यानंतर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. त्याने या 'मुहंम्मद कुलीखानास', दिलेरखानासोबत महाराष्ट्रावर मोहिमेसाठी पाठवले. मे १६७६ रोजी पश्चाताप झालेले नेताजी मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले. १९ जून १६७६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.



२७ मार्च इ.स.१६८९
छत्रपती शंभूराजेंच्या मृत्यूनंतर मातबरखान कोकणात (कल्याण जवळ) उतरला. तो माऊलीहून २७ मार्च १६८९ रोजी कल्याणला आला. नंतर त्याने कल्याणकडील दुर्गाडी किल्ल्याला वेढा घातला. अगदी अल्प काळातच ह्या किल्ल्याचा शासन कारभार सुरळीतपणे चालवण्याचे त्याने औरंगजेबास आश्वासन दिले. माहुलीगड म्हणजे तळकोकणचे प्रमुख ठाणे असल्याचे त्याने औरंगजेबाला कळवले. परंतु त्याच्या परिसरात मोगल साम्राज्याची कोठेही ठाणी नव्हती. किल्ल्यात दाणागोट्याचा साठा मुबलक होता आणि किल्ला अत्यंत बळकट होता. दुर्गाडीच्या किल्ल्याला वेढा घालण्याच्या दृष्टीने त्या किल्ल्याच्या सभोवतालच्या परिसरात मोगलांची सुसज्ज अशी लष्करी ठाणी बसवणे महत्त्वाचे होते. तेव्हा मातबरखानाने फितुरीच्या तंत्राने माहुली सर करण्याचे ठरविले. त्याने गडावरील किल्लेदाराशी संधान बांधले. द्वारकाजी (किल्लेदार) आणि त्यांच्या सैन्याच्या तुकडीतील काही सैनिकांनी बादशहाची चाकरी स्वीकारावी असे आवाहन मातबरने आग्रहपूर्वक केले. मोगलांना जे सामील होतील त्यांना मनसब देण्याचे, बक्षीस आणि इतरही शाही मानमरातब देण्याचे आश्वासन खानाने दिले. मोगल औरंगजेबकडून त्यांना सनदा दिल्यावर द्वारकाजी व त्याच्या अनुयायांनी माहुली आणि त्याच्या परिसरातील महेंद्रगड, पासलगड वगैरे किल्ले मोगलांच्या स्वाधीन करण्याचे मान्य केले. मातब्बरखानाने माहुलीगडाच्या किल्लेदाराला २५०० सुवर्ण मोहरा दिल्या आणि किल्ल्याचा ताबा घेतला. मातब्बरखानाने कल्याण काबीज केले.





२७ मार्च इ.स.१७३७
चिमाजीअप्पांनी ठाणे जिंकले.
२६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला. जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले.



२७ मार्च इ.स‌.१७६७
मालेराव होळकरांचा मृत्यू
मल्हाररावांचे एकुलते एक पुत्र खंडेराव कुंभेरीच्या १७५४ च्या वेढ्यात त्यांस तोफेचा गोळा लागला व त्यांत त्यांचे निधन झाले (१७ मार्च १७५४).
त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनी खंडेरावांचा मुलगा मालेराव यांस इंदूरच्या गादीवर बसविले. मालेराव राज्यप्राप्तीनंतर दहा महिन्यांत २७ मार्च १७६७ रोजी मरण पावले.

141 views16:20
ओपन / कमेंट
2023-03-26 11:45:41
240 views08:45
ओपन / कमेंट
2023-03-26 11:45:39 यात त्रिंबकराव पेठे मरण पावले आणि रघुनाथरावाला बऱ्हाणपूरकडे जाण्यास संधी मिळाली.





YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
214 views08:45
ओपन / कमेंट
2023-03-26 11:45:39 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२६ मार्च इ.स.१६६७
छत्रपती शिवाजी महाराज श्रीनृप शालिवाहन शके १५८९ पल्वंग नामसंवत्सर, चैत्रशुद्ध पौर्णिमा रोजी सिंधुदुर्गावर पोहोचले. याचवेळी हिरोजींनी या रयतेच्या राजाचे चरणकमल चुनखडी व जस्त मिश्रणावर मुद्रित करून सिंधुदुर्ग किल्ल्यावर इतिहासाचे एक सोनेरी पान साकारले होते. तीन वर्षे सुरू असलेले काम शिवरायांनी पाहिल्यानंतर सिंधुदुर्ग कृतकृत्य झाला होता. सिंधुदुर्गाच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या हिरोजींनी महाराजांकडे एक इच्छा मागितली, ते म्हणाले, "महाराज या किल्ल्यावर तुम्ही सदैव असावे असे आम्हाला वाटते. आमची एक इच्छा आहे, तुमचे चरणकमल आमच्या नेहमी दृष्टीस पडावेत. "छत्रपती हिरोजींकडे बघतच राहिले. महाराजांनी होकार देताच चुनखडी आणि जस्ताचे मिश्रण असलेले तबक हिरोजींनी मागविले. दोन तबके पुढे आणण्यात आली आणि हिरोजींनी महाराजांना आपले एक पाऊल या तबकात ठेवण्यास सांगितले. महाराजांनी आपला डावा पाय तबकात ठेवला. तर दुस-या तबकात आपला उजवा हात. स्वत: राजांनी.. दुस-या कुणीही नव्हे, चुन्यामध्ये उठविले आपल्या हाताच्या पंज्याचे आणि पावलांचे ठसे हिरोजींचा चेहरा प्रचंड उजळला. त्यांना कधी नव्हे तो आनंद झाला होता. तुतारी निनादली तोफांचे बार उडाले पुन्हा चौघडा वाजू लागला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२६ मार्च इ.स.१६६७
औरंगजेब बादशहाने 'मिर्झाराजा जयसिंग' यांची दक्षिणेची सुभेदारी काढून घेतली आणि 'शहजादा मुअज्जम' ला दक्षिणेचा नविन सुभेदार नेमले.
.


२६ मार्च इ.स.१६८१
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार शनिवार)

औरंगजेबाने मुसलमानी प्रजेवरही कर लावला.
पैशांच्या टंचाई मुळे त्याने मुसलमानी जनतेवर २.५% नजर लावून खजिना वाढीकडे जातीने लक्ष दिले. याआधीच बिगर मुसलमानी प्रजेवर साडेतीन टक्के कर लावला होता



२६ मार्च इ.स.१७३७
चिमाजी अप्पांनी साष्टी जिंकले



२६ मार्च इ.स.१७५५
तुळाजीने १७५४ मध्ये इंग्रजांची अनेक जहाजे पकडली, काही जाळली. तुळाजीने आपल्या आरमारात अनेक नवीन जहाजे बांधविली व त्यांवर पगारी यूरोपीय कामगार नेमले. यामुळे पश्चिम किनाऱ्यावर तो जणू अनभिशिक्त राजात समजला जाऊ लागला. आंग्रे यांच्याशी मराठ्यांचे संबंध बाळाजी बाजीराव ऊर्फ नानासाहेब पेशवेच्या कारकीर्दीत बिनसले. हे तंटे कमी करण्याऐवजी पेशव्याने ते वाढविले, असा शाहूंचा स्पष्ट आरोप होता. पेशव्यांचे इंग्रज आणि पोर्तुगीज या पाश्चिमात्य सत्तांशी मैत्रीचे संबंध होते. इ.स.१७५६ मधे तुळाजी आंग्रेंच्या विरुध्द पेशवे आणि इंग्रजांनी संयुक्त आघाडी उघडली. पेशव्यांनी जमिनीवरून व इंग्रजांनी पाण्यावरून हल्ला केला. त्याचा फायदा घेऊन आंग्रे बंधूचा मिळेल तितका प्रदेश जिंकण्याचा सपाटा पेशव्यांनी लावला. तुळाजीने घाबरून नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहून उभय पक्षांचा घरोबा पूर्वीपासून चालत आहे, त्याची अभिवृद्धी व्हावी असे कळविले; तथापि पेशव्याने २६ मार्च १७५५ रोजी तुळाजीविरोधी संयुक्त मोहिमेस प्रारंभ केला. अखेर तुळाजीचा पराभव होऊन विजयदुर्ग फेब्रुवारी १७५६ ला इंग्रजांच्या हाती पडला.



२६ मार्च इ.स.१७७४
बारभाई कारस्थान - कासेगांवची लढाई
उत्तर पेशवाईत रघुनाथरावाने अन्यायाने पेशवेपद मिळविण्यासाठी केलेला प्रयत्न अयश्स्वी करणाऱ्या मराठी सेनानी व मुत्सद्दी यांचा संघ. नारायणरावाच्या वधानंतर पेशवाई मिळविण्यासाठी रघुनाथरावाने केलेल्या कारवायांना प्रतिबंध करण्यासाठी प्रामुख्याने हा स्थापन झाला. बारभाई म्हणजे बारा माणसांचे मंडळ असे नसून काही एका हेतूने एकत्र जमलेला समूह होता. बारभाई मंडळ स्थापन झाले, तेव्हा त्यात सखाराम बापू, भगवंत बोकील, बाळाजी जनार्दन उर्फ नाना फडणीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके, मालोजी घोरपडे, महादजी शिंदे, तुकोजी होळकर ही प्रमुख मंडळी होती. रघुनाथरावाला पदच्युत करून नारायणरावाची गरोदर पत्नी गंगाबाई हिच्या नावाने कारभार करावा तिला मुलगा झाला तर त्यास, नाही तर दत्तक घेऊन त्याच्या नावाने कारभार करावा, असे सुरुवातीस कारस्थान ठरले. यालाच बारभाई कारस्थान म्हणतात. सखाराम बापू व नाना फडणीस हे कारभारी आणि त्रिंबकराव पेठे यांच्याकडे फौजेची अखत्यारी ठेवावी असे ठरले. पार्वतीबाई आणि गंगाबाई यांना मारण्याचा कट उघडकीस येताच सखारामबापू नाना फडणीस, हरिपंत फडके यांनी गंगाबाईला पुण्याहून १७ जानेवारी १७७४ रोजी पुरदंरच्या किल्ल्यावर नेले आणि तिच्या नावाने कारभार सुरू केला. त्यामुळे रघुनाथराव व बारभाई संघ असा उघड सामना सुरू झाला. यातूनच २६ मार्च १७७४ रोजी कासेगावची लढाई झाली.
174 views08:45
ओपन / कमेंट
2023-03-25 18:45:25
202 views15:45
ओपन / कमेंट
2023-03-25 18:45:11 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

२४, २५, २६ मार्च १६६२ :-
( चैत्र पौर्णिमा, वद्य प्रतिपदा, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, सोमवार, मंगळवार, बुधवार )

मराठा मोगल संघर्ष :-
मराठा मोगल संघर्षाचा विक्रम. जागोजागी शाहिस्त्याला शह देण्यासाठी मराठ्यांच्या चकमकी सुरू होत्या. मराठी मनगट काय असते याची प्रचिती शाहिस्त्याला आली होती.
याच सुमारास पेणवर छापा घालून नामदार खानाला झटका दिला. या जबरदस्त लढाईत वाघोजी काका तुपे जखमी तर कृष्णाजी काका बाबाजी धारतीर्थ पडले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२५ मार्च इ.स.१६८३
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार रविवार)

मोगल मराठा चकमकी!
हा काळ दोहोंसाठी म्हणजे मोगल व मराठ्यांसाठी संघर्षाचा होता. जागोजागी मराठा व मोगल संघर्षाच्या चकमकी उडत होत्या. एका मराठी सैन्य पथकाने पेडगावच्या बहादुरगडावर हल्ला केला. मात्र शहजादा आज्जमने मामुरखानास बहादुरगडावर जायची आज्ञा केली तसा तो वेगाने बहादुरगडाकडे आला. मराठ्यांनी देखील मग अतिरिक्त हानी टाळण्यासाठी किल्ल्यापासून ३५ मैल दौड केली. मात्र शेवटी संघर्ष झालाच व त्यात दोन्हीकडचे योद्धे कामी आले.



२५ मार्च इ.स.१६८७
(चैत्र वद्य सप्तमी, शके १६०९, संवत्सर प्रभव, वार शुक्रवार)

छत्रपती संभाजी महाराजांची कुतुबशाहास मदत!
छत्रपती संभाजी महाराजांचे राज्य बुडविता येत नाही तेव्हा नामुष्की टाळण्यासाठी किमान अदिलशाही आणि कुतुबशाही संपवावी या हेतूने सप्टेंबर इ.स.१६८६ मध्ये अदिलशाहीचा अंत झाल्यावर आता औरंगजेबाची वक्रदृष्टी कुतुबशाहीकडे वळली. छत्रपती संभाजी महाराजांनी आपले १२ हजार घोडदळ, व ५० हजार पायदळ, कुतुबशहाच्या मदतीस पाठविले. येथे एक गोष्ट निश्चित सांगण्यासारखी आहे की, मराठी सैन्य जे कुतुबशाही वाचविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी पाठविले होते. त्या सैन्याने गनिमी काव्याने महाराष्ट्रात मोगलांना धुळ चारली होती. हाच कित्ता आता भागानगरात गिरवत होते. मराठी सैन्य मोगलांची रसद तोडण्याचे काम करीत असत अन् लचके तोडून निघून जात त्यामुळे मोगली सैन्य बेजार होऊ लागले. इतके की, कुतुबशाही व मराठ्यांच्या सैन्यापुढे मोगल सैन्य असमर्थ ठरू लागले.



२५ मार्च इ.स.१६८९
(चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६११, संवत्सर शुक्ल, वार सोमवार)

हिंदवी स्वराज्याची राजधानी मोगली विळख्यात!
स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड काबीज करण्याची मोहीम औरंगजेबाने झुल्फिकारखानाची नेमणूक केली होती. मराठ्यांच्या राजधानीस वेढा घालण्यात आला. रायगडावर या समई मराठ्यांचे संपूर्ण राजकुटूंब निवास करत होते. महाराणी येसुबाईसाहेब, शिवराज्ञी सकवारबाईसाहेब, शाहुराजे, राजारामराजे, त्यांच्या पत्नी ताराराणीसाहेब, व राजसबाईसाहेब हे खासा कुटुंब, सोबत मराठ्यांचे थोर सेनानी संताजीराव घोरपडे, धनाजीराव जाधव, प्रल्हाद निराजी, आदी शिवकाळातील मंडळी सुद्धा रायगडावर होती. मात्र रायगडाला वेढा पडला होता.



२५ मार्च इ.स.१७०३
सिंहगड किल्लेदाराच्या मृत्यू नंतर मोगलांचे मोर्चे २१ मार्च रोजी कल्याण दरवाजात पर्यंत सरकले होते.
त्यास उत्तर म्हणून किल्ल्यातील दीड हजार मराठयांनी २५ मार्च रोजी उजबेकखांनाच्या ठाण्यावर सडकून हल्ला केला. व तेथे कापाकापी करून परत किल्ल्यात गेले.





२५ मार्च इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
207 views15:45
ओपन / कमेंट
2023-03-24 08:55:29
27 views05:55
ओपन / कमेंट
2023-03-24 08:55:28 २४ मार्च इ.स.१७८३
पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले. डिचोलीचा किल्ला हस्तगत झाल्यावर पोर्तुगीज सैन्याने साखळीचा कोट घेतला. परंतु १ वर्षाने त्यांनी गुळेली हे गाव परत घेऊन दि. २ नोव्हेंबर १७८२ या दिवशी साखळीच्या कोटास वेढा घातला. कोट पडला. परंतु पोर्तुगीज सैन्याला कुमक आल्याने त्यांनी फिरुन काबीज केला. पोर्तुगीज सैन्य पेडणे महालात घुसले,



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
28 views05:55
ओपन / कमेंट
2023-03-24 08:55:28 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२४, २५, २६, मार्च इ.स.१६६२
(चैत्र पौर्णिमा, वद्य प्रतिपदा, द्वितीया, शके १५८४, संवत्सर शुभकृत, वार सोमवार)

मोगल मराठा संघर्ष!
२६ मार्च इ.स.१६६२ मोगल मराठा संघर्षाचा विक्रम जागोजागी शाहिस्तेखानाला शह देण्यासाठी मराठ्यांचा एल्गार सुरू होता. मराठी मनगट काय असते याची शाहिस्तेखानाला मजबूत प्रचिती आली होती. याच सुमारास पेणवर छापा घालून नामदार खानाला करारा झटका याच जबरदस्त लढाईत वाघोजी तुपे जखमी तर कृष्णाजी बाबाजी धारातिर्थी पडले. मात्र मराठी राज्यात सह्याद्रीच्या डोंगररांगात आता आपण जास्त तग धरू शकत नसल्याची मोगली सेनेला जाणिव झाली. मात्र इतके पराभव, लुटपात होऊनसुद्धा औरंगजेबाकडे मात्र खोटीनाटी पत्रे पाठवून १शाइस्तेखान विजयाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराभवाच्या खोट्या गोष्टी करत लालमहालात ऐशोआरामात लोळत होता.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२४ मार्च इ.स.१६७४
मुंबई बेट इंग्रजांच्या ताब्यात इ. स. १६६४ डिसेंबरमध्ये आले. त्या वेळेपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांशी सख्य राखण्याचा प्रयत्न करीत होते. तदनंतर जानेवारी, १६६४ च्या सुरत येथील लुटीच्या निमित्ताने त्यांचा शिवाजी महाराजांशी प्रत्यक्ष संबंध आला. मोगलांकडून शिवाजी महाराजांनी आपले सर्व गड किल्ले घेतले हे पाहून इंग्रजांना शिवाजी महाराजांबद्दल दहशत निर्माण झाली. पण इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा शत्रू जो सिद्दी यास गुपचूप मदत करण्याचे धोरण ठेविले. शिवाजी महाराजांना हे कळताच त्यांनी इंग्रजांना तंबी दिली. याचा परिणाम असा झाला की सिद्दीचे आरमार पावसाळ्यासाठी १० मे १६७३ रोजी मुंबई बंदरात आश्रयासाठी येऊ लागले तेव्हा त्यास इंग्रजांनी येऊ दिले नाही. इंग्रजांना शिवाजी महाराजांशी चांगले संबंध राखावयाचे होते म्हणून त्यांनी आपला वकील थॉमस निकोलसन यास ११ जून १६७३ रोजी शिवाजी महाराजांच्या भेटीस पाठविले. परंतु त्याचीही काही फलनिष्पती झाली नाही. तेव्हा इंग्रजांतर्फे नारायण शेणवी हा इंग्रजांचा दुसरा वकील बोलणी करण्यास २४ मार्च १६७४ रोजी रायगडावर शिवाजी महाराजांकडे गेला. तसेच ऑक्सिंगडेन हाही शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकाच्या वेळी इंग्रजातर्फे नजराणा घेऊन गेला. २४ मार्च १६७४ रोजी तो निराजीपंताची भेट घेण्यासाठी पाचाड येथे थांबला. पण निराजी पंत रायगडावर होते; म्हणून त्यांनी आपल्या आगमनाची वर्दी गडावर धाडली. त्यावर निराजींनी गडावरून निरोप धाडला की, छत्रपती शिवाजी महाराज यांची एक भार्या नुकतीच निर्वातल्या असल्यामुळे राजे सुतकांत आहेत. सुतक फिटेपर्यंत गडावर न येता (पाचाडास) माझे घरी रहा. नारायण शेणवीने पाच दिवस पाचाड येथे रिकामटेकडेपणात घालविले. २८ मार्च रोजी पाडव्याच्या निमित्ताने निराजी गडावरून पाचाड येथे आला.



२४ मार्च इ.स.१६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
२४ मार्च १६७७ ते एप्रिल १६७७ या काळात छत्रपती शिवरायांचा आंध्रप्रदेश येथील 'श्री शैल्यम मल्लिकार्जुन' येथे मुक्काम.
शिवाजी महाराजांचीही श्री शैल्यम मल्लिकार्जुनावर आत्यंतिक श्रद्धा होती. या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी या देवालयाच्या विशाल गोपुरांचे बांधकाम करून दिले आणि येथील नित्य पूजेसाठी व्यवस्था केली. तसेच मंदिराच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी रक्षक पथकाचीही नियुक्ती केली. भागानगर पासून काही अंतरावर असलेल्या आणि कृष्णा नदीच्या तीरावर वसलेल्या गोपुरास 'श्री शिवाजी गोपूर' असे नाव असून तिथे छत्रपती शिवरायांच्या हातात तलवार घेतलेले दगडातले कोरीव शिल्प उपलब्ध आहे.


२४ मार्च इ.स.१७१९
रफी उदजीत यास बादशाही मिळाल्यानंतर बाळाजी विश्वनाथ पेशव्यास बादशहाकडून तारीख १३ मार्च रोजी दक्षिणेतील सहा सुभ्यांच्या चौथाई वसुलीबाबत तिन्ही फर्माने मिळाली. त्यात तंजावर, त्रिचनापल्ली, म्हैसूर या मांडलिक राज्यांकडूनही चौथाई वसूल करण्याचा हक्क कबूल करण्यात आला. २४ मार्चच्या फर्मानाने सरदेशमुखी हक्क कबूल करण्यात आले आणि तिसऱ्या फर्मानाने शाहू महाराजांकडे शिवाजी महाराजांच्या वेळचे स्वराज्य कायम केले आणि बादशहाच्या कैदेत असलेले शाहू महाराजांचा भाऊ मदनसिंग व आई यांची रवानगी बाळाजी विश्वनाथांबरोबर दक्षिणेत केली. बरोबर फर्माने व शाहू महाराज मंडळीस घेऊन पेशवे बाळाजी विश्वनाथांनी मार्च १७१९ च्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली सोडली. परतीचा प्रवास ह्या मंडळीनी राजपुतान्यातून जयपूरवरून सिरोंज, भेलसा आणि माळवा यातून करीत हंडिया येथे नर्मदा
पार केली.



20 views05:55
ओपन / कमेंट
2023-03-23 08:27:48
150 views05:27
ओपन / कमेंट