Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 9

2023-03-31 10:19:20 ३१ मार्च इ.स.१७४३
सन १७४३ च्या फेब्रुवारी महिन्याचे प्रारंभी पेशवे पन्नास हजार फौजेनिशी बिहार प्रांतात दाखल झाले. पुढे पेशवे कूच करून मुर्शिदाबादेस निघाले. रघूजीनी बरद्वान परगणा ताब्यात घेऊन कटवा येथे सैन्याची छावणी केली. पेशव्यांनी तारीख ३१ मार्च १७४३ रोजी तुकोजी पवार, शिंदे, होळकर, जाधव इत्यादि सरदारांसह अलिवर्दीखानाची भेट घेतली. पेशवे व नबाब यांच्या भेटीत असे ठरले की, नबाबाने शाहू महाराजांस चौथाई द्यावी आणि पेशव्यास सैन्याचे खर्चाबद्दल बावीस लाख रुपये द्यावेत. रघूजी भोसल्यांनी बंगाल प्रांतावर स्वारी करू नये. याविषयी पेशव्यांनी रघूजी भोसल्यांशी करार करून बंदोबस्त करावा. पुढे नबाब व पेशवे आपल्या सर्व सैन्यानिशी रघूजी भोसल्यांवर चाल करून गेले. मराठे घोडदळापुढे नबाबाचे घोडेस्वारांचा टिकाव लागला नाही.



३१ मार्च इ.स.१७४४
भास्कर राम आपल्या २१ सेनानींसोबत "मानकरा" मैदानात आले. भास्कररामाने बंगाल वर इ.स.१७४४ मध्ये तिसरी स्वारी केली. अलीवर्दीखान त्यामुळे हताश झाला. पेशव्यांना दिलेले पैसे वाया गेले होते. यावेळी मात्र त्याने एक नवा डाव खेळण्याचे ठरविले. त्याचा प्रमुख अफगाण सेनापती गुलाम मुस्तफाखान यांच्याशी सल्लामसलत करून नबाबाने मराठी विरांविरुद्ध एक कट रचला, मराठ्यांना मित्रत्वाच्या नात्याने बोलावून त्यांची कत्तल करण्याची ही योजना गुप्तपणे तयार झाली. चर्चमध्ये जी रक्कम ठरेल ती देण्यास नबाब उत्सुक असून मराठे येऊन नबाबास भेटतील तर लागलीच रक्कम अदा केली जाईल असे आश्वासन नबाबाच्या लोकांनी मराठ्यांना दिले. विश्वासघात होणार नाही याचे आश्वासन मिळाल्याने भास्कर रामाने नबाबाकडे येण्याचे कबूल केले. भेटीचा मुहूर्तही ठरला. भेटीसाठी "मानकरा" मैदान ठरविण्यात आले. भास्कर राम आपल्या २१ सेनांनींसोबत "मानकरा" मैदानात आले. जानकीराम आणि मुस्तफाखान यांनी त्यांचे स्वागत केले. मराठ्यांना खास सजविलेल्या तंबूत रुजामे पसरले होते. मराठ्यांची सरबराई चालू असतानाच इशारा झाल्यावर तंबूच्या भोवती जमलेल्या नबाबाच्या सैनिकांनी मराठ्यांवर हल्ला चढवून २२ मराठी विरांना दगलबाजीने ठार केले. मराठी सैन्याने माघार घेतली. नबाबाने सैन्यात १० लाखांची खैरात केली. सर्व अधिकाऱ्यांना बढत्या दिल्या. बंगालमध्ये मात्र आजही भास्कर रामाचा धाक आहे. लहान मुल रडायला लागले तर आया त्यांना दम देतात की, रडायचे थांबा नाही तर भास्कर पंडीत येऊन तुला घेऊन जाईल.



३१ मार्च इ.स.१८५८
तात्या टोपे लक्ष्मीबाई राणीच्या मदतीला
ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.





YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
192 views07:19
ओपन / कमेंट
2023-03-31 10:19:20 आजचे ऐतिहासिक शिव'कालीन दिनविशेष

३१ मार्च इ.स.१६६५
( चैत्र वद्य दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वासू, शुक्रवार )

दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला
जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना ह्या किल्ल्याकडे पाठविल्या. त्या आसपासच्या मुलुखात स्वाऱ्या, जाळपोळ व लुटालूट करू लागल्या.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link





३१ मार्च इ.स.१६७६
शिवरायांचे जावळीचा देशाधिकारी आबाजी मोरदेव यास रामदासस्वामींबद्दल पत्र
दि. ३१ मार्च १६७६ रोजी, म्हणजेच राज्याभिषेकच्या दुसऱ्या शकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या जावळी प्रांताचा देशाधिकारी आबाजी मोरदेव याला आज्ञा केली. काय ? तर कसबे चाफळ येथील श्री रघुनाथाचे देवस्थान, कसबे नाणेघोळ आणि कसबे कराड येथील देवालये येथील नित्य पूजा आणि तिथल्या देवाच्या सेवकांना वेतन तसेच श्री रामदासस्वामी जिथे कुठे असतील, त्यांच्या सोबत जो शिष्यसमुदाय असेल त्यांच्यासाठी नुकतीच सनद सादर केली आहे (हि चाफळची जुनी, पहिली सनद होय). समर्थांच्या चाफळच्या देवस्थानाबद्दल, अन्नछत्र आणि भक्तसमुदायाकरिता प्रतिवर्षी ६० खंडी तांदूळ व ६१ खंडी नागली म्हणजे नाचणी देत जाणे असं म्हणून तिथल्या सुभेदारांना आज्ञा केली होती. श्री रामदासस्वामी शिवथर असता या सनदेप्रमाणे पावतच होते.



३१ मार्च इ.स.१६८३
(चैत्र शुद्ध चतुर्दशी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार शनिवार)

राहुल्लाखान बहादुरखानास मिळाला.
बहादुरखानाचा पराभव होतो आहे असे समजताच राहुल्लाखान बहादुरखानास मिळण्यास निघाले. राहुल्लाखान जवळ भरपूर सैन्य असल्याने त्याने पुर्ण अंदाज घेऊनच मराठ्यांवर हल्ला केला. मराठ्यांच्या गनिमी काव्यापुढे मोगली सैन्य टिकाव धरू शकत नसल्याचे कळल्यामुळे संतप्त बादशहाने राहुल्लाखास नाशिकला पाठविले. मात्र कल्याण-भिवंडीच्या मोहीमेत छत्रपती संभाजी महाराजांनी बादशहास मराठी बाण्याचे दर्शन घडवून बादशाही मोहीम झुगारून टाकून त्याचे मनसुबे उधळले.



३१ मार्च इ.स.१६८३
(चैत्र शुद्ध चतुर्दशी, शके १६०५, संवत्सर रुधिरोद्रारी, वार शनिवार)

पेडगावला मराठ्यांचा धुमाकूळ!
मोगल सेना औरंगजेबाच्या का होईना जागोजागी लढत होती. मराठ्यांनी तर यल्गारच मांडला होता. मराठे पेडगावात धुमाकूळ घालत पुढे चाल करून येत असल्याची बातमी मोगलांना मिळाली. मोगलांची फार वाताहात या युद्धात झाली सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचा मोगलांना सराव नसल्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर आपला टिकाव लागत नाही याची जाणीव मोगल सरदारांना आता होत होती. अवघ्या ३ वर्षातच मोगलांना कळून चुकले की, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुढे आपला टिकाव लागणे कठीण आहे.





३१ मार्च इ.स.१६८६
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार बुधवार)

इंग्रजांचे पत्र!
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांचा कावा फार आधीच ओळखला होता. इंग्रजांचा सतत प्रयत्न होता की, त्यांचे चलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चालावे, परंतु महाराजांनी सतत या प्रश्नाला बगल दिली. किमान छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात तरी आपले चलन रहावे याचा आटापिटा इंग्रज करीत होते. त्याचसाठी इंग्रजांचे जोरदार प्रयत्न सुरू होते. मुंबई व सुरतेला पत्रे आली, त्याचा मजकूर "मुंबईत आपली टांकसाळ असावी, छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यात आपले चलन चालावे याकरिता छत्रपती संभाजी महाराजांना गोड बोलून मदत करत रहावी". अशा आशयाचा होता. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी या मुत्सद्देगिरीला केराची टोपली दाखवली. हे पत्र आजही इतिहासात उपलब्ध आहे याची नोंद घ्यावी.

153 views07:19
ओपन / कमेंट
2023-03-30 09:06:38
83 views06:06
ओपन / कमेंट
2023-03-30 09:06:33 https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
83 views06:06
ओपन / कमेंट
2023-03-30 09:06:33 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

३० मार्च इ.स.१६६३
(चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार)

सरसेनापती नेतोजी पालकर जखमी!
मोगली मुलखात लुटालूट करण्यासाठी सरसेनापती नेतोजी पालकर गेले होते. परंतु दैव प्रतिकूल होते. त्यामुळे मोगली मुलखातच मुघल फौजेने त्यांना गाठले व चकमक झाली. सरसेनापती नेतोजी पालकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु बळ कमी पडल्यामुळे मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हाताला व पायाला जखमा होऊन ते जायबंदी झाले. मात्र मराठा फौजेचा पाठलाग करीत मुघल सैन्य विजापुर मुलखात दाखल झाले. यावेळी रस्तम ए जमान याने मुघलांची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. अपरिचित मुलूख असुन अनवट वाटा व जंगल असल्यामुळे सरसेनापती नेताजी पालकर यांचा पाठलाग करु नये. असे सांगून मुघल सैन्य माघारी पाठविले. रुस्तम-ए-जमान व महाराजांचा अंतस्थ स्नेह अशा रीतीने उपयोगास आला.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




३० मार्च इ.स.१६६५
मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला पुरंदरा कडे निघाला.



३० मार्च इ.स.१६८४
(चैत्र वद्य दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार रविवार)

औरंगजेबाचे विजापुरकरांना फर्मान!
औरंगजेबाने विजापुरकरांना एक फर्मान धाडले. त्यात विजापुरकरांना खडसावून सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांची तुमची मित्रता व सख्य करण्याचे सोडून आपण सर्वांनी एकदील होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा फडशा पाडला पाहीजे. या आशयाचे हे फर्मान म्हणजे विजापुरकरांना एक प्रकारे तंबी होती.



३० मार्च इ.स.१७२९
थोरले बाजीराव पेशवे यांनी जैतापुर इथे महंमदशहा बंगश याचा पराभव केला.
नर्मदेच्या उत्तरेकडच्या प्रदेशाला हिंदुस्थान म्हणत.
त्या सुमारास रोहिलखंडाच्या महमद बंगश याने बुंदेलखंडावर आक्रमण केले.
बुंदेल राजे महाराज छत्रसाल आक्रमणाने त्रस्त झाले.
त्यांनी राऊंना आपल्या भाषेत दोन चरणांत आपली स्थिती लिहून कळवली, त्याचा मथितार्थ

जो गती गजेंद्र की, सोही गत पावत आज
बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज ।।

सुसरीच्या तोंडात पाय अडकलेल्या लक्ष्मीच्या गजेंद्र-हत्तीची जी गत, त्या अवस्थेत मी आहे.
अशा प्रकारचा छत्रसाल यांचा याचनास्पद निरोप येताच, राऊंनी महाराज छत्रसाल बुंदेल्यांना त्यांच्यावर झालेल्या आक्रमणासमयी प्रत्यक्ष जाऊन मदत केली आणि बंगशला पळवून लावले.



३० मार्च इ.स.१७४०
फेब्रुवारी १७४० रोजी नासिरजंग विरुध्द जिंकून मुंगीपैठण येथे तह झाला. तहात नासिरजंगने हंडिया व खरगोण हे बाजीरावांना दिले. त्याचीच व्यवस्था लावण्यासाठी ३० मार्च रोजी बाजीराव खरगोणला गेले. या स्वारीत अचानक बाजीरावांची प्रकृती बिघडली.





३० मार्च इ.स.१७४१
सातारा व कोल्हापूरकर छत्रपति या एका झाडाच्या दोन फांद्या. ह्या दोन गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता. त्यास चिमाजीअप्पांची संमति होती. कोल्हापूरकर संभाजी राजे शाहू महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख २ जून १७४० ते ३० मार्च १७४१ पर्यंत साताऱ्यास राहिले. ह्या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजी राजांशी वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी ह्या बद्दल एक गुप्त करार संभाजी राजांशी केला. हा करार शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली. करार नानासाहेब व चिमाजी अप्पा ह्या उभयतांनी संभाजी राजे यास लिहून दिला. त्यातील मुख्य बाब अशी “सातारचे राज्य स्वामींचे आणि एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजी राजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे सेवक परंतु अंतर्यामी स्वामींचे, शाहू महाराज ह्यांनी कैलासवास केल्यावर दोन्ही राज्ये स्वामींची व आम्ही सेवक स्वामींचे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करू”. शाहू महाराज निवर्तल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली की हा करार मागे पडला आणि दोन्ही राज्यांचा समेट घडवून आणण्याचे काम तसेच राहून दोघांच्या भांडणामुळे राष्ट्राची हानी व्हावयाचे टळले नाही.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
74 views06:06
ओपन / कमेंट
2023-03-29 08:15:18
16 views05:15
ओपन / कमेंट
2023-03-29 08:15:08 जो जेरोनिमो बुरुज काबीज करून मराठे साष्टीत घुसले त्याचे नामकरण ‘फत्तेबुरुज’ करण्यात आले. अपुरा दारुगोळा आणि शिबंदी यामुळे पोर्तुगीज आपल्या कुटुंबकबिल्यासह गलबतातून वसई आणि उरणकडे पळून गेले. २९ मार्च १७३७ ला ठाण्याच्या किल्ल्यावर मराठ्यांचा जरीपटका डौलाने फडकला. पोर्तुगीज साष्टीतून कायमचे हद्दपार झाले.



२९ मार्च इ.स.१७५५
इंग्रजांच्या मदतीने पेशव्यांनी आंग्रेंचा सुवर्णदुर्ग घेतला
तुळाजी आणि पेशव्यांचे आधीच वैर असल्याने तुळाजी पेशव्यांचे आदेश मानेनासा झाला,सरकारात ऐवज भरण्यास मनाई करू लागला आणि स्वतंत्र कारभार करू लागला.सुवर्णदुर्ग ते दक्षिण कोकण वर वर्चस्व,प्रबळ आरमार आणि पराक्रमी असल्याने पेशव्यांना नुसत्या फौजेनिशी त्याचा पराभव करणे शक्य नव्हते. त्यामुळे पेशव्यांनी तुळाजी विरुध्द युद्धासाठी इंग्रजांची मदत मागितली,इस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांकडून वारंवार खंडणी घेतल्याने इंग्रज तुळाजीचा काटा काढण्याची संधीच शोधत होते.इंग्रज आणि पेशवे यांच्यादरम्यान १९ मार्च १७५५ रोजी हा दुर्दैवी करार झाला.
इंग्रजांनी या मोहिमेची कामगिरी कप्तान विलियम जेम्स यांच्याकडे सोपवली.इस्ट इंडिया कंपनीची ४१ लढाऊ गलबते मुंबईहून सुवर्णदुर्गकडे निघाली त्यांना पुढे पेशव्यांची ६० गलबते,७ तारवे आणि १ बातेला येऊन मिळाले.अश्या प्रकारे हे संयुक्त आरमार २९ मार्च १७५५ ला सुवर्णदुर्ग ला येऊन थडकले.२ एप्रिल १७५५ रोजी इंग्रजांनी कप्तान विलियम जेम्स याच्या नेतृत्वाखाली सुवर्णदुर्ग जिंकून पेशव्यांच्या हवाली केला.



२९ मार्च इ.स.१८५७
क्रांतिकारक मंगल पांडे यांनी बराकपूरच्या छावणीमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांवर गोळ्या झाडल्या व इथूनच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला खरी सुरुवात झाली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
16 views05:15
ओपन / कमेंट
2023-03-29 08:15:08 आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष

२९ मार्च इ.स.१६५७
(चैत्र वद्य दशमी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार रविवार)

औरंगजेब अडकला!
विजापुर काबीज करून दिल्लीचे तख्त मिळवायचे व नंतर सम्राट म्हणून मिरवायचे असे मनी धरून, औरंगजेबाने बिदर कल्याणी हा भाग जिंकला. पण याच अतिउत्साहात औरंगजेब एका मोक्याच्या क्षणी अफजलखानाच्या हातात सापडला. अफजलखान विजापुरच्या बादशहाशी एकनिष्ठ होता. त्यामुळे त्याने औरंगजेबास ठार मारायचे ठरविले व विजापुरवरील संकट कायमचे दूर करावयाचे असे मनोमन ठरविले. बिदरचा किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात आला. मात्र याच प्रयत्नात औरंगजेब अफजलखानाच्या तावडीत सापडून जिवावरच्या संकटावर सापडला होता.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link





२९ मार्च इ.स.१६६७
सिंधुदुर्ग आज रोजी बांधून पूर्णत्वास आला, म्हणून महाराजांनी गडावर मोठी पूजा घातली.
मालवणच्या समुद्रात असलेल्या ‘‘कुरटे‘‘ बेटावर शुध्द खडक, मोक्याची जागा व गोड्यापाण्याची सोय ह्या गोष्टी पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा केली;" या जागी बुलंद किल्ला बांधून वसवावा चौर्‍यांशी बंदरी ऐशी जागा नाही"! आणि ‘‘सिंधुदुर्ग‘‘ नावाची शिवलंका साकार झाली. सिंधुदुर्गच्या उभारणीने मराठ्यांच्या नौदलाला बळ मिळाले. इंग्रज, पोर्तुगीज, चाचे यांना वचक बसला. ‘‘चौर्‍याऎंशी बंदरात हा जंजिरा, अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका अजिंक्य जागा निर्माण केला. सिंधुदुर्ग जंजिरा, जगी अस्मानी तारा जैसे मंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन राज्यास भूषणप्रद अलंकार चतुर्दश महारत्नांपैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त झाले‘‘ हा चित्रगुप्ताच्या बखरीतील मजकूर सिंधुदुर्ग किल्ल्याचे महत्व सांगून जातो.

मालवण किनार्‍यावरील मोरयाचा धोंडा ह्या गणेश, चंद्रसूर्य, शिवलिंग कोरलेल्या खडकांची पूजा करुन व समुद्राला सुवर्ण श्रीफळ अर्पण करुन महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मुहुर्ताचा चिरा बसवला. किल्ला बांधण्यासाठी ५०० पाथरवट, २०० लोहार, १०० गोवेकर पोर्तुगिज व ३००० मजूर ३ वर्षे अहोरात्र खपत होते. सागरी लाटांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी व किल्ल्याचा पाया भक्कम करण्यासाठी उकळते शिसे ओतून त्यावर मोठे मोठे चिरे बसवण्यात आले. तसेच घाटावरुन मागवलेला चुना वापरुन किल्ल्याचे इतर बांधकाम करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम २९ मार्च १६६७ रोजी पूर्ण झाले. त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज स्वत: हजर होते. किल्ले बांधणीच्या ३ वर्षाच्या काळात महाराजांनी लिहीलेली किल्ले बांधणी संबंधी मार्गदर्शन करणारी पत्र उपलब्ध आहेत.



२९ मार्च इ.स.१६७०
२९ मार्चला मुंबईकर इंग्रजांनी त्यांच्या सुरतेच्या वरिष्ठाना अजून एक पत्रं लिहिलं त्या पत्रात ते म्हणत आहेत. मुंबई - सुरत
'शिवाजीला कोणाचाही विरोध न होता तो एकसारखा जिंकत चालला आहे. त्याने मोगलांपासून पुरंदर किल्ला घेतल्याची आज बातमी आली. कर्नाळा देखील फार दिवस टिकाव धरणार नाही.'



२९ मार्च इ.स.१६८५
विजापुरचे किल्ल्याला वेढा पडला.
रसलपुरच्या बाजूने (पश्चिमेकडून) बहादुरखान, शहापुरचे बाजूने राहुल्लाखान बक्षी, नागठाण विजापुरपासूनचे ८ मैलांवरील (सु.१३ कि.मी. वरील) ठिकाणी बहादुरखानाचा तळ पडला. लढाईची सर्व सुत्रे शहजादा आज्जमच्या हातात होती. मोगली वकील खाज्या अब्दुल रहीम याच्याशी लढाई सुरू झाली. त्याच्या मदतीस बहादरखानाचा मुलगा दौलतमुरा व राजमहंमद याचे तक्त्यात येऊन किल्ल्यावर हल्ला करून परत गेला.





२९ मार्च इ.स.१७३७
मराठ्यांचा जरीपटका साष्टीवर डौलाने फडकला
मराठे पोर्तुगीजांना साष्टीतून हद्दपार करण्यासाठी वसई मोहिमेवर निघाले. मराठ्यांची फौज साष्टी किल्ल्यावर आणण्याचे महत्त्वाचे काम गंगाजी बंधू बुबाजी नाईक यांनी पार पाडले. चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखालील मराठी सैन्य राजमाची, प्रबळगड, खिडकाळी, शिळ मार्गे कळव्यात आले. लढणारी तुकडी साष्टीकडे (ठाण्याकडे) रवाना झाली. २६ मार्च १७३७ ला कळव्याकडून आलेल्या या तुकडीने जेरोनिमो हा पाणबुरूज काबीज केला. इशारतीच्या तोफा होताच बदलापूर मुक्कामी असलेले चिमाजी आप्पा सैन्यासह कळव्यात आले. आप्पासाहेबांनी स्वतःच्या हातांनी चिखलावर पेंढा पसरवून मराठी सैनिकांना प्रोत्साहन दिले. रातोरात मराठी सैन्य कळव्याची खाडी ओलांडून साष्टीत (ठाण्यात) शिरले. २७ व २८ मार्च रोजी चिमाजी आप्पांनी साष्टीतील सर्व चौक्या पहाऱ्यांचा बंदोबस्त केला.
19 views05:15
ओपन / कमेंट
2023-03-27 19:21:07
185 views16:21
ओपन / कमेंट
2023-03-27 19:20:53 २७ मार्च इ.स.१७८५
आग्रा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात!
बादशहाचे फर्मान घेऊन रायाजी पाटील हा आग्रा येथे पोहोचला. त्याची नेमणूक आग्रा येथे किल्लेदार म्हणून झाली होती. परंतु आग्रा येथील किल्लेदार शुजादिलखान याने किल्ला लढविण्याची तयारी केली. रायाजीने शहर, गज, मंडी येथे बंदोबस्त केला तो किल्ल्याला मोर्चे लावण्यासाठी आला. त्याने खंदक खणण्यास प्रारंभ केला. तेथून त्याने आग्रा किल्ल्यावर तोफांची सरबत्ती सुरू केली. त्या भडिमाराने किल्ल्याची तटबंदी फुटू लागली. बादशहाला घेऊन महादजी शिंदे येताच किल्ल्याचा वेढा आवळण्यात आला. शुजादिलला आता दुसरा मार्गच उरला नव्हता. हाताखालचे सगळेच जाण्यापेक्षा काहीतरी हाताशी ठेवावे, या इराद्याने त्याने महादजी शिंदे यांच्याशी बोलणी सुरू केली. वार्षिक ५२ हजार रुपये उत्पन्नाची जहागीर घेऊन त्याने २७ मार्च इ.स.१७८५ रोजी आग्रा किल्ला मराठी फौजेला देऊन टाकला. मोगली साम्राज्याच्या दुसऱ्या शहरावर मराठी ध्वज फडफडू लागला. याच किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहा औरंगजेबासमोर सिंहगर्जना केली होती. जोधपुरचा राजा जसवंतसिंह याचा जामरूद येथे म्रृत्यू झाल्यावर आग्रा किल्ल्याच्या आत असलेला त्याचा मुलगा अजितसिंह याला घेऊन दुर्गादास राठोड आणि त्याच्या मारवाडच्या वीरांनी तलवार बाजी करून तेथूनच त्याला बाहेर नेले होते. त्या आग्रा येथील दुर्गावर मराठी निशाण फडकत होते. ते फडकताना पाहून मराठी विरांचे उर निश्चित भरून आले असतील.





YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
187 views16:20
ओपन / कमेंट