Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश

2023-04-30 08:23:01
158 views05:23
ओपन / कमेंट
2023-04-30 08:22:56 ३० एप्रिल इ.स.१७८४
इतिहासातील राखीपौर्णिमा
अहिल्याबाई होळकरांनी जोधपुरच्या राजाशी मैत्रीचे व स्नेहाचे संबंध वाढवण्यासाठी राखी पाठवली होती. राजा मानसिंहाने राखीबंधभाई याचे प्रतीक म्हणून होळकर घराण्यातील राण्यांना अनेक प्रकारे मदत केलेली आढळते. भेट म्हणून ३० एप्रिल १७८४ च्या मकाराणा येथिल सनदेनुसार अहिल्याबाईंना मंदिरासाठी जोधपुरच्या राजाने पांढराशुभ्र संगमरवरी दगड उपलब्ध करुन दिला होता.
https://youtube.com/shorts/LlgmJxX6G4E?feature=share


३० एप्रिल इ.स.१९०८
राजद्रोहाचा खटला
प्रफुल्लचंद्र चक्रवर्ती आणि खुदिराम बोस या तरुणांनी मुझ्झफरपूर येथे युरोपियन क्लब समोर कलकत्याचा प्रेसिडेन्सी मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड याच्या बग्गीवर हातबॉम्ब टाकला. पण बग्गीमध्ये किंग्जफोर्ड नव्हताच, दुर्दैवाने त्यात बॅरीस्टर र्प्रिंगल केनेडी याची पत्नी व कन्या मारल्या गेल्या. गाडीवानही ठार झाला. पोलिस पकडायला येताच मोकामे स्टेशनवरतीच प्रफुल्लचंद्रांनी आत्महत्या केली, खुदिराम पकडले गेले व चौकशी - खटला वगैरे कायदेशीर सोपस्कार पार पाडून त्यांना ११ ऑगस्ट १९०८ रोजी फाशी दिली. जबानी व न्यायालयात झाल्याप्रकाराची सगळी जबाबदारी खुदिराम बोसांनी घेतली. अत्यंत शांतपणे वंदे मातरम्‌चा घोष करत ते फासावरती गेले.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
160 views05:22
ओपन / कमेंट
2023-04-30 08:22:55 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

३० एप्रिल इ.स.१६६४
सुरत लुटीचे पडसाद...
इस १६६४ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. या लुटीत अगणित द्रव्य महाराजांना लाभले. दुसरीकडे या घटनेने औरंगजेबाचा तिळपापड उडाला होता. खरंतर सुरतेतून मिळणारं उत्पन्न औरंगजेबाच्या बहिणीला (जहांआरा बेगम) मिळण्याची व्यवस्था औरंगजेबाने केली होती. त्याकाळी सुरत व्यापाराची राजधानी होती परंतु शिवाजी महाराजांच्या दणक्याने अनेक व्यापारी सुरत सोडून चालले होते. यावर तोडगा म्हणून औरंगजेबाने मोठ्या उदारपणे एक वर्षभर इंग्रजांना व इतर सर्व व्यापाऱ्यांना जकात माफ करण्याचा हुकुम काढला. एवढेच नाही तर पुढेही एक चतुर्थांश जकात दरसाल माफ होईल असे संकेत दिले. बंगालला लिहलेल्या ३० एप्रिल १६६४ च्या पत्रात "आपल्या शहरांतील व्यापाऱ्यांना उत्तेजन मिळावे व झालेल्या नुकसानीची भरपाई व्हावी म्हणून एक वर्षाच्या जकाती औरंगजेबाने माफ केल्या असे लिहले आहे".


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/LlgmJxX6G4E?feature=share

३० एप्रिल इ.स.१६६५
(वैशाख वद्य एकादशी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार रविवार)

दाऊदखानाचा किल्ले राजगडावर हल्ला!
मिरझाजयसिंगच्या नेतृत्वाखाली सुमारे ७००० स्वार स्वराज्य बेचिराख करण्यास पाठवून दिले. महाराज याच सुमारास राजगडावर असताना राजगडला मोगली वेढा पडल्यावर मराठ्यांचा प्रतिकार कसा होईल? मराठयांनी असा काय तिखट प्रतिकार केला की, मोगल सैन्य जेवढे पुढे आले होते तेवढेच मागे सरकले. राजगडावरून पद्मावती, संजीवनी माचीवरून आग ओकणाऱ्या तोफा, बाणांचा अचूक वेध, बंदुकीच्या माऱ्यांचा पाऊस अश्या मराठी रेट्यासमोर मोगली सैन्य टिकेनासे झाले. निरुपाय होऊन दाऊदखान २ कोस मागे हटला.



३० एप्रिल इ.स.१६७४
एप्रिल १६७४ ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज कंपनीस खालील खणखणीत निरोप पाठविला की, “सिद्दीला बंदरात जागा दिल्यास मी तुमच्याशी युद्ध करून बादशाही आरमार जाळण्याचा शक्य तितका प्रयत्न करीन आणि मुंबई बेट घेण्याकरिता डचांना १० हजार सैन्याची कुमक करीन” याकरता आपण सिद्दीला प्रवेश मुळीच देता कामा नये. छत्रपती बशिवाजी महाराजांच्या या धमकीमुळे मुंबईकर इंग्रज भयभीत झाले. त्यांनी ३० एप्रिल १६७४ रोजी सुरतेस पत्र लिहून छत्रपती शिवाजी महाराज कशा रीतीने इंग्रजांस त्रास देणार आहेत याबद्दल कळविले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहीचे करारनामे इंग्रजांस पाठविले. त्याचे भाषांतर केल्यानंतर इंग्रजांच्या लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अटी जाचक आहेत. त्यानंतर हेन्री ऑक्झिंडेनला छत्रपती शिवाजी महाराजांशी तहाचे बाबतीत सूचना देऊन रायगडी राज्याभिषेक समारंभास जाण्यास निरोप दिला.



३० एप्रिल इ.स.१६८४
(वैशाख वद्य एकादशी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार बुधवार)

औरंगजेब बादशहाचे आदिलशाहीवर आक्रमण!
औरंगजेब बादशहाचे आज्ञापत्र स्थानिक शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग व्हावा म्हणून शहाजहानने आदिलशाही व कुतुबशाही ही मांडलीक राज्ये खालसा न करण्याचा निर्णय घेतला होता. औरंगजेब बादशहाने एकदा, ही राज्ये खालसा करण्याचा प्रयत्न करून पाहीला पण तो अयशस्वी ठरला! कारण शहाजहानची औरंगजेबास अडचण येत होती. नंतर महाराज छत्रपती झाल्याने औरंगजेब बादशहाची अजूनच अडचण झाली. कारण विजापुरचा प्रदेश जिंकून महाराज हद्द वाढवून राज्याचा विस्तार करीत होते. मात्र महाराजांच्या महानिर्वाणानंतर पुन्हा एकदा उचल खाल्ली. धर्माचे वेड औरंगजेब बादशहास स्वस्त बसू देत नव्हते. अशातच औरंगजेब बादशहाचा मुलगा अकबर, छत्रपती संभाजी महाराजांकडे येऊन राहिल्याने औरंगजेब बादशहाच्या अडचणीत अजून भर पडत होती! या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सिकंदर अदिलशहास औरंगजेबाने आज्ञापत्र लिहीले. सिकंदर हा वयाने लहान असल्याने सिकंदरचा कारभारी रुस्तमखान यास औरंगजेब बादशहाने आज्ञापत्र लिहीले त्यानुसार,
१ स्वारी खर्च व रसद काही सबब न सांगता पोहोचविणे.
२ आपल्या मुलूखातून रसद येण्याजाण्याचा मार्ग मोकळा ठेवणे.
३ गरज असेल तेव्हा मोगलांची मदत करणे.
४ छत्रपती संभाजी महाराजांची मित्रता सोडून त्यांचा समूळ फडशा पाडण्यासाठी तयारी करणे.
५ सर्जाखान यास आपल्या मुलूखातून हाकलून देणे. • या कलमांसह त्याने विजापुरकरांना बांधून ठेवले आणि चांगलाच अंकुश ठेवला.



३० एप्रिल इ.स.१७००
सातारा हस्तगत झाला त्याच दिवशी बादशहाने फतुल्लाखानास ‘परळीचा किल्ला’ (सज्जनगड) काबीज करण्यासाठी पाठवले व मागून म्हणजेच आजच्या दिवशी बादशाहा जातीने तिथे पोहचला.

99 views05:22
ओपन / कमेंट
2023-04-30 08:22:40
68 views05:22
ओपन / कमेंट
2023-04-30 08:22:29 २९ एप्रिल इ.स.१६८५
फरह बख्श बागेजवळ औरंगजेब बादशहाने मुक्काम केला. दि. २६ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाचे तंबू अहमदनगरहून हलविण्यात आले. फरह बख्श बागेजवळ डेरे देण्यात आले. जमादिलावल महिन्याच्या ५ तारखेसच म्हणजेच, आजच्या दिवशी, २९ एप्रिल इ.स.१६८५ रोजी औरंगजेब बादशहाने त्या ठिकाणी मुक्काम केला.





२९ एप्रिल इ.स.१७०५
१७०५ एप्रिल महिन्यात त्र्यंबक शिवदेव, पंताजी शिवदेव आणि रामजी फाटक यांनी सिंहगडावर हल्ला केला आणि तेथील मोगल शिबंदीचा पराभव करून तो किल्ला आपल्या ताब्यात आणला. गडाचा मोगल किल्लेदार देवीसिंग यास कैद केले. हे महाराणी ताराबाईंना समजताच त्यांनी २९ एप्रिल १७०५ रोजी रामजी फाटक यांस पत्र लिहिले, “तुमच्या सेवेचा मुजरा जाहला. तुम्ही मर्दानी सेवक आहात या उपरीही आपण स्वामी कार्य करीत जाणे म्हणजे कुलास उर्जीत होईल.”



२९ एप्रिल इ.स.१८५८
बाबुराव सेडमाकेंनी ब्रिटिश फौजांचा एप्रिल १८५८ मधे सगणपूर व बामनपेट येथे पराभव केला. या यशाने अत्याधिक आनंदित झालेल्या बाबुरावने २९ एप्रिल १८५८ रोजी प्राणहितेच्या तीरावरील अहेरी जमीनदारीमधील चिंचगुडी येथे ब्रिटिशांच्या टेलीग्राफ कॅम्पवर हल्ला केला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
70 views05:22
ओपन / कमेंट
2023-04-30 08:22:28 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२९ एप्रिल इ.स.१६६१
(वैशाख शुद्ध ११, एकादशी, श्रीनृपशालिवाहन शके १५८३, संवत्सर प्लव, वार सोमवार)

शृंगारपुर स्वराज्यात दाखल!
शृंगारपूरचा सूर्यराव सुर्वे जास्तच शेफरला होता.
आदिलशहाच्या हुकूमानुसार महाराजां सोबत अकारण वैर धारण केले होते. शिवाजी महाराजांनी शृंगारपूर जिंकले व तेथील सुर्यराव सुर्व्यांची गादी स्वतःच्या लाथेनी उडवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६१ मध्ये तळकोकण मोहिमेत राजापुर घेतल्यानंतर आपला मोर्चा शृंगारपुरकडे वळवला. तिथे सूर्यराव सुर्वे आपल्या दहा हजार लोकांसह शेजारील स्वराज्याच्या मुलखात पुंडावा करत उपद्रव देत असे. हा उपद्रव नाहिसा करण्यासाठी शिवरायांनी शृंगारपुरावर अचानक छापा टाकला, पण त्याआधीच सूर्यराव सुर्वे पळून गेला.
चकमक चांगली झाली, सूर्यराव सुर्वे यांचे सैनिक शरण आले आणि मराठयांनी शृंगारपूर जिंकत त्या भागात असलेला प्रचितगड देखील स्वराज्यात दाखल केला. संगमेश्वर येथे रस्त्याचे दुरुस्तीचे काम करीत असताना सुर्यरावणे विनाकारण तानाजी काकांच्या छावणीवर हल्ला केला. पण तो हल्ला तानाजी काकांनी क्षणात सावरून उधळून लावला व सुर्वेला पळून जाण्यास भाग पाडले. महाराजांना हे कळताच तानाजी काकांचा सत्कार केला आणि सुर्वेला अजून एक संधी द्यायची ठरविले व ते पत्राद्वारे महाराजांनी सुर्वेला कळविले आणि भेटीसाठी बोलावले. होकार देऊन ही सुर्वे काय भेटीला येईना.
मग, महाराजांनी शृंगारपुरीकडे १५००० खड्या स्वारांसह मोहरा वळविला. घाबरून स्वतःच्या रक्षणासाठी सुर्वे पळून गेला. महाराज शृंगारपुरीत पोहोचले आणि सुर्वे पळून गेल्याचे समजताच महाराज संतापले आणि सुर्वेचे सिंहासन लाथेने उडवून लाविले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link




२९ एप्रिल इ.स.१६७५
उत्तर कोकणात पोर्तुगीजांकडून दरवर्षी चौथ वसूली करून आता शिवाजी महाराज पोर्तुगीजांकडे आदिलशाही कोकणचा भाग म्हणून साष्टी, बार्देसचीही मागणी करू होते. फोंडा मोहिमेच्या वेळी स्वत: शिवाजी महाराज २९ एप्रिल १६७५ रोजी दुपारी सैन्य घेऊन साष्टी प्रांतातील काही देसायांच्या आणि आदिलशहा सरदार रणमस्त खानाचा पाठलाग करत चांदर गावात शिरले. पुढे कुंकळी गावातील बाजारात सैन्य घेऊन दाखल झाले. कुंकळीत काही घरांची लुटालूट केल्यानंतर या सैन्याचा तळ कुंकळीतील चांभारभाटात मुक्कामास राहिला. यावेळी कुंकळीतील पोर्तुगीज कॅप्टन मानुएल डी मोता हा होता. या कॅप्टनकडे दारूगोळ्याची मागणी केली. तेव्हा कॅप्टनने गव्हर्नरला कळविले तेव्हा गव्हर्नरने सल्लागारांच्या बैठकीत हा विषय मांडला. तेव्हा सल्लागारांनी मत मांडले की, शिवाजीचे सैन्य कुंकळी गावात हेतूपरस्पर शिरले की वाट चुकून शिरले त्याची अगोदर चौकशी करण्यात यावी व त्याचा पुढचा पावित्रा काय आहे याचा तपास करावा. त्या दरम्यान शिवाजीचा जो वकील या शहरी (ओल्ड गोव्यात) सध्या आहे त्यास स्थानबद्ध करून ठेवावे. म्हणजे पुढे जो काय निर्णय आपल्याला घ्यायचा आहे त्या संबंधाने हा वकील आपल्या हाती असला तर त्याचा उपयोग होईल.’ पुढे लवकरच फोंडा जिंकल्यावर मात्र पोर्तुगीजांनी शिवाजी महाराजांशी मवाळ धोरण स्वीकारले.



२९ एप्रिल इ.स.१६८०
महाराजांच्या महानिर्वाणाबाबतची माहिती!
पाँडेचरीचा संस्थापक आणि राजापुरचा मुख्य अधिकारी फ्रेंच मार्टिन लिहीतो की "छत्रपती शिवाजी महाराज काही दिवसांपूर्वीच वारले. उघड्या मैदानावरील लढाईतील यशापेक्षा आपल्या कुशाग्र बुद्धीने मुत्सद्देगिरीतील क्षमतेमुळे हिंदुस्थानातील उच्चतम व्यक्तींच्या पंक्तीत महाराज विराजमान होते महाराजांचा उत्तराधिकारी ठरविण्यास महाराजांच्या अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराजांचा ज्येष्ठ मुलगा हा महाराजांचा कायदेशीर वारस आहे".



२९ एप्रिल इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांची सन १६८२ च्या जानेवारीत आंजेदिव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधण्याची योजना केली आहे. या योजनेनुसार दगड, चुना व अन्य साहित्य आंजेदिव बेटाकडे रवाना करण्यासाठी संबंधितांना आज्ञा दिली गेली आहे ही खबर दोतोर लुईस गोन्साल्विज कोत या व्हाॅइसराॅयच्या सेक्रेटरीला समजली. त्याने व्हाॅइसराॅयला दिनांक २९ एप्रिल सन १६८२ रोजी कळवीले की...
"आता असे कळते की, संभाजीराजे ह्यांनी त्या बेटाच्या तटबंदीचा नकाशासुध्दा तयार केला असून त्या कामास लवकरच सुरवात होणार आहे."

99 views05:22
ओपन / कमेंट
2023-04-27 14:21:20
259 views11:21
ओपन / कमेंट
2023-04-27 14:21:16 २७ एप्रिल इ.स.१८५८
वीर बाबुराव सेडमाके - १८५७ च्या उठावातील गोंडवनाचा तेज:पुंज क्रांतीसूर्य
क्रिश्टनने नागपूरहून लेफ्टनंट जॉन नटल यांच्या नेतृत्वाखाली पायदळाची अजून एक तुकडी मागवून घेतली. नव्याने प्राप्त झालेली ही कुमक सोबतीला घेऊन ब्रिटिश फौज २७ एप्रिल १८५८ रोजी बामनपेट येथे बाबुराव सेडमाकेच्या सैन्याशी भिडली. दोघा सैन्यात पुन्हा एकदा जोरदार झुंज झाली. परंतु ह्या खेपेससुद्धा बाबुरावच्या सैन्याने कुरघोडी करीत ब्रिटिश सैन्यास पराभूत केले.



२७ एप्रिल इ.स.१९०९
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ह्यांची जयंती
अंधश्रद्धा निर्मूलन, जातिभेद निर्मूलन यांसाठी श्री. तुकडोजी महाराजांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/c/thegreatmarathawarriors
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/



हर हर महादेव, जय श्रीराम
जय भवानी, जय शिवाजी.
233 views11:21
ओपन / कमेंट
2023-04-27 14:21:16 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२७ एप्रिल इ.स.१६६३
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५८ साली उत्तर
कोकणवर स्वारी केली. तेव्हा पोर्तुगिजांच्या चौल आणि दमण ठाण्यांना मराठा सैनिकांकडून उपसर्ग पोचला. पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६१ साली दक्षिण कोकणवर स्वारी केली. त्यावेळी त्यांचे सैन्य गोव्याच्या हद्दीपर्यंत आले. शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाचा पराभव केल्यावर त्याचे अभिनंदन पोर्तुगिजांनी दिनांक २७ एप्रिल १६६३ च्या पत्राने केले. ही वेळपावेतो छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांचे डिचोली आणि साखळी हे दोन प्रांत जिंकून घेतले, तेव्हा पोर्तुगिजांनी आपला वकील रामजी शेणवी यास अभिनंदनपर पत्र देऊन राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाठविले.


https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/_1LMx4pYPpo?feature=share

२७ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखान किल्ले रोहिडा जवळ पोहचला. कुत्बुद्दीनखान व बलुदीखान (लोदीखान) हे अनुक्रमे जुन्नर तर्फ व तळकोकणात मिर्झाराजे जयसिंग यांच्या आज्ञेनूसार धुमाकूळ घालीत होतेच. आता जोडीला शव्वाल महिण्याच्या २१ तारखेस, म्हणजेच दि.२७एप्रिल इ.स.१६६५ दाऊदखानही किल्ले रोहिडा जवळ पोहचला आणि मोगली धुमाकूळाला चहू अंगांनी ऊत आला. किल्ले रोहिडा ते किल्ले राजगड या भागातील हिंदवी स्वराज्याची ५० खेडी मोगलांनी जाळून पार उद्ध्वस्त करून टाकली. त्या भागातील मराठे डोंगरातील खिंडीच्या आश्रयाने ४, चार खेड्यांत जमा झाले. मोगलांची एक तुकडी त्या भागात चालून गेली. पण मराठ्यांनी जबर झुंज मांडली. तेव्हा तिकडील मोगलांनी दाऊदखानाकडे अधिक कुमक पाठवा म्हणून कळविले. त्याप्रमाणे त्याने राजा रायसिंह व अचलसिंह कछवाह यांना फौजेसह पाठविले. ही फौज येत असलेली दिसताच मराठे डोंगरात निसटून गेलेत. मोगलांनी ही चार गावेही बेचिराख करून टाकली. तेथील गरीब प्रजा, गुरे-ढोरे व मालमत्ता मोगलांच्या हाती पडली. अनेक माणसे कैद झाली.



२७ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

राजापुरकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहीलेल्या पत्राची नोंद !
"छत्रपती संभाजी महाराजांनी कारभार आपल्या हातात घेऊन राजपदवीही घेतली आहे. सुभेदार, हवालदार इ. आधिकारी लोकांना त्याने आपल्याकडे बोलावले. कित्येकांना कैद केले. कित्येकांना कामावरून दुर केले. छत्रपती संभाजी महाराजांचा नवा सुभेदार येथे आला. तेव्हा त्याला आम्ही जाऊन भेटलो. तेव्हा त्याने मोठ्या प्रेमाने व स्नेहाने आमची भेट घेतली"."



२७ एप्रिल इ.स.१६८०
(वैशाख शुद्ध नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे परिस्थितीवर संपूर्ण नियंत्रण आणि अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे अटकेत!
स्वराज्याचे वारसदार युवराज शंभुराजे यांना पकडण्यासाठी किल्ले रायगडला झालेल्या कटाचा सुगावा युवराज शंभुराजे यांना लागलेला होता. आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी शंभुराजे यांनी योग्य ती पावले टाकली. राजापुरास माणसे पाठवून धनधान्यांची तजवीज केली. रावजी पंडित यांस बोलावून कारवारच्या सर्व सुभेदारांना आर्थिक आय व्यय देण्यासाठी बोलावले संपूर्ण कारभार आपल्याच हाती घेऊन राजपदवी घेतली. सुभेदार, हवालदार, लष्करी अधिकारी व दस्तुरखुद्द सरलष्कर शंभुराजेंच्या बाजूने असल्याने शंभुराजेंनी बिनघोर पावले उचलली. याच सुमारास अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांनी जासुदांना पन्हाळ्याच्या आधिकारी यांना देण्यासाठी पत्रे पाठविली त्यांना आजच्या दिवशी अटक करण्यात आली. पुढे मात्र सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याकडून दस्तुरखुद्द अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशवे यांना अटक केली गेली.
https://youtube.com/shorts/_1LMx4pYPpo?feature=share


२७ एप्रिल इ.स.१६८३
गोव्याचा विजरई कोंट द आल्चोर सालसेट प्रांतातील सचोल या ठिकाणी गेला. तेथे त्याचे वास्तव्य २ महिने होते. जुन महिण्यात पाऊस सुरू झाला. पाऊस इतका पडला की, समुद्राप्रमाणे शेते भरून गेली. बाहेरून अन्नपुरवठा बंद पडला. लोक उपाशी मरू लागले. इ.स.१६८१ मध्ये कोंद दी आल्वोर हा गोव्याचे विजरईपदी विराजमान झाला. त्यावेळी गोव्यात पटकीची साथ होती. इ.स.१६८२ ला अतिवृष्टीमुळे दुष्काळ पडला. आणि इ.स.१६८३ मध्ये त्याने आपल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे आक्रमण ओढवून घेतले. कोंट द आल्वोर हा अतिशय शूर योद्धा होता. स्पेनमधील अनेक लढ्यांत आघाडीवर होता. त्यास युद्ध मोहिमांचा चांगला अनुभव होता. गोव्यात हजर होण्यापूर्वी तो अंगोल्याचा गव्हर्नर होता.

170 views11:21
ओपन / कमेंट
2023-04-26 13:11:02
207 views10:11
ओपन / कमेंट