2023-04-02 15:51:48
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
२ एप्रिल इ.स.१६६०
पन्हाळा च्या वेढ्यात जौहरच्या तोफांचा मारा पन्हाळागडावर पोहोचेना म्हणून राजापूरच्या इंग्रज वखारवाल्याकडे एका लांब पल्ल्याची तोफ व दारूगोळा याची मागणी केली. जौहरचे बळ सारखे वाढत होते. शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे व पालवणीकर जसवंतराव दळवी हे सैन्य घेऊन जौहरला सामील झाले. इंग्रजांच्या राजापूर वखारीचा मुख्य हेन्री रिव्हींग्टन होता, याने जौहरची मागणी मंजूर केली आणि इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी, लांबपल्ल्याची मोठी तोफ व दारूगोळ्याचे पेटारे घेऊन हेन्री साथीदार फिलिप गिफर्ड आणि मिंगहॅमसह राजापुराहून २ एप्रिल १६६० रोजी निघाला, तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी १० एप्रिल १६६० च्या सुमारास दाखल झाला. त्याने आपल्या तोफांचे पन्हाळगडाला मोर्चे लाऊन थेट तोफेला बत्ती दिली, अन् नुसती बत्ती दिली नाही तर शेजारी ब्रिटिशांचे निशाणही फडकावले. याला म्हणतात स्वतःच्या शौर्याबद्दलचा 'अधिक आत्मविश्वास'! महाराजांना अर्थातच गडावरून हे सारे दिसले होतेच. महाराज भयंकर संतापले. काही दिवसांपूर्वीच या इंग्रजांना आपण सवलत दिली, तेच आपल्यावर इतक्या लवकर उलटून आले!
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link
https://youtube.com/shorts/NG8Xf6fSv8Y?feature=share
२ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र वद्य अष्टमी, शके १५८५, शोभन, वार सोमवार)
महाराजांचे पत्र!
चिंताग्रस्त करणारी बातमी याच सुमारास किल्ले सिंहगडावरून आली होती. शाहिस्तेखानाने स्वराज्यात फंदफितुरीचे सत्र अवलंबले होते. तशातच किल्ले सिंहगडावर फितुरी करून भेदाने हा मोक्याचा गड आपल्या ताब्यात घेण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू केले होते. किल्ले सिंहगड मोगलांच्या घशात जाणे म्हणजे पुणे प्रांत हातातून जाण्यासारखे होते. त्यामुळे महाराजांनी अत्यंत तातडीने मोरोपंत पेशवे आणि निळोपंत मुजुमदार यांना पत्र पाठविले.
२ एप्रिल इ.स.१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला
आलमगीर अर्थात औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय? असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल. कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे. पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत. एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू. मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन "जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
शेख हमदानीने लिहिलेल्या "जसीरात-ए-मुल्क" प्रमाणे जगण्यासाठी खलिफ़ा उमरने मुस्लिमेतरांना इस्लामी देशात पुढील अटी घातल्या.
१) त्यांनी नवीन मंदीर अथवा प्रार्थनास्थळ बनवू नये.
२) तोडलेल्या जुन्या इमारतीचे पुर्निर्माण करू नये.
३) मुस्लिम यात्रेकरूंना मुस्लिमेतरांच्या मंदीरात रहाण्यावर बंधन राहणार नाही.
४) कोणताही मुसलमान कोणत्याही बिगर मुस्लिम व्यक्तीच्या घरी ३ दिवस राहू शकेल. त्या काळात त्याने केलेले कोणतेही कृत्य गुन्हा मानला जाणार नाही.
५) जर मुस्लिमेतरांची सभा असेल त्या सभेत मुसलमानांना भाग घेण्यास प्रतिबंध न करणे.
६) मुस्लिमेतरांनी मुस्लिमांसारखी नावे ठेऊ नयेत.
७) त्यांनी मुस्लिमांसारखा पोषाख वापरू नये.
८) लगाम, खोगीर असलेला घोडा वापरू नये.
९) धनुष्य बाण व तलवार वापरू नये.
१०) अंगठी वापरू नये.
११) त्यांनी दारू विकू नये वा पिऊ नये.
१२) त्यांनी जुना पोषाख बदलू नये.
१३) आपले रितीरिवाज व धर्म यांचा प्रचार करू नये.
१४) आपल्या मृतांची शवे त्यांनी मुस्लिम कबस्तानाजवळ आणू नयेत.
१५) आपल्या मृत व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करू नये.
१६) त्यांनी मुस्लिम नोकर ठेऊ नये.
१७) त्यांनी हेरगिरी करू नये वा हेरांना मदत करू नये.
यातील एखाद्या जरी अटीचा भंग झाला तर भंग करणार्याला मृत्यूदंड व त्याची मालमत्ता एखाद्या युद्धकैद्याप्रमाणे जप्त केली जाई.
https://youtube.com/shorts/NG8Xf6fSv8Y?feature=share
२ एप्रिल इ. स. १६७९
(वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार बुधवार)
युवराज शंभुराजेंना घेऊन दिलेरखानाचा किल्ले भुपाळगडावर हल्ला!
दिलेरखान आणि युवराज शंभुराजे किल्ल्याला भिडले.
चाकण येथील संग्रामदुर्गावर ५६, छपन्न दिवस शाहिस्तेखाना बरोबर झुंज देणारे व त्याला आपल्या अतुल पराक्रमाने चकित करणारे फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून विठ्ठल भालेराव हे सबनीस होते. दिलेरखानाने मराठ्यांच्या विरुद्ध इखलासखान, राजा जसवंतसिंह बुंदेला, रशीद अली रोशनाई ऊर्फ इल्हामुल्लाहाखान यांना रवाना केले.
253 views12:51