Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 143

2021-07-25 08:04:16 *Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २५ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *





* २५ जुलै इ.स.१६४८*

महाबली शहाजी राजे कर्नाटकांत हिंदू सरदारांना आदिलशाही विरुद्ध दंड पुकारण्याची चिथावणी देत आहेत. अशी तक्रार आदिलशाही सरदार ने आदिलशहाकडे करीत. हे शहाजी महाराजांना समजल्यावर त्यांनी आदिलशाहीतील नोकरी सोडून कुतुबशाहीत जाण्याकरिता कुतुबशहा स पत्र पाठवून विचारले.तेही आदिलशहास समजले. तेव्हा त्यांना पकडण्यासाठी कामगिरी मुस्तफाखान याच्यावर सोपविण्यात आली. शहाजी महाराजांची जिंजीला छावणी होती. खानाने जिंजी येथील छावणीला वेढा घालून ते झोपेत असताना त्यांना शके १५७० श्रावण व.१ दि. २५ जुलै इ.स.१६४८ पकडले गेले. काही दिवस त्यांना कर्नाटकात ठेवल्यावर मुस्तफाखान ९ नोव्हेंबर इ.स.१६४८ रोजी मरण पावला व त्याच्या जागी आदिलशहाने अफजलखानास नेमीले.अफजलखानाने महाराजांना बंदोबस्ताने बरोबर घेऊन विजापुरास पोहचविले.
525 views05:04
ओपन / कमेंट
2021-07-25 08:03:56
313 views05:03
ओपन / कमेंट
2021-07-25 08:03:45 *Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २४ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *

https://youtube.com/shorts/ymyUC5j8YMU?feature=share


* २४ जुलै इ.स.१६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
दक्षिणेतील मोहीमेदरम्यान छत्रपती शिवरायांनी "विल्लुपुरमचा किल्ला (जिंजी)" जिंकून संपूर्ण "विल्लुपुरम" ताब्यात घेतले.



* २४ जुलै इ.स.१६९५*
छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला(इ.१६९४ एप्रिल २३) काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगावं या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देवाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत. या पत्रांच्या अनुरोधाने सेनापती संताजीराव घोरपडे यांनी इ. १६९५ जुलै २४ रोजी वरील गावास कोणत्याही प्रकारे उपद्रव न देण्याबाबत आणि कोणी दिलाच तर त्याचे पारिपत्य करण्याची पागेस आज्ञा केलेली आहे.
343 views05:03
ओपन / कमेंट
2021-07-23 12:08:33 *Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २३ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *





*गुरू पोर्णिमाच्या सर्व शिवप्रेमीना हार्दिक शुभेच्छा...!*

* २३ जुलै इ.स.१६७१*

*छत्रपती शिवाजी महाराजांचे पाटीलकीवरून चाललेल्या तंट्याविषयी पत्र..!*

पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.
611 views09:08
ओपन / कमेंट
2021-07-23 12:08:18
455 views09:08
ओपन / कमेंट
2021-07-23 12:08:12 *Shiv Dinvishesh Today शिवदिनविशेष | आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष | आज दि. २२ जुलै २०२१ *

*संपूर्ण video स्वरूपात पाहा Link *





* २२ जुलै इ.स.१६७५*

*(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार) महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी!*

किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख व १७ किल्ले मोगलांना परत करावेत दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंचे पंच हजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली. बहादुरखानाने मोठ्या आनंदाने तहाचे वृत्त औरंगजेब बादशहाकडे रवाना केले. औरंगजेब बादशहा यावेळी वायव्य सरहद्दीवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांशी यशस्वी तह घडवून आणल्याबद्दल औरंगजेब बादशहा बहादुरखानावर प्रसंन्न झाला. बहादुरखानाची बढती करण्यात येऊन तो आता सप्त हजारी मनसबदार झाला. औरंगजेब बादशहाने त्याला एक हत्तीही बक्षिस दिला. त्याचे भाऊ व मुले यांचाही औरंगजेब बादशहाने गौरव केला. बहादुरखानही या सन्मानामुळे खुष झाला. त्याने या निमित्ताने बहादुरगड येथे प्रचंड उत्सव साजरा केला. मेजवान्या, बैठकी यांची एकच रेलचेल उडाली. या आनंदोत्सवात बहादुरखानाने ३० हत्ती, ५०० घोडे, २००० वस्त्रे, तरवारी व अन्य शस्त्रे देणगी दाखल आपल्या सरदार, आधिकारी व सेवक वर्गाला दिल्या. परंतु हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. पहिल्या पंधरवड्यात बहादुरखानाने महाराजांकडे कबूल केलेले १७ किल्ले ताब्यात देण्याबद्दल मागणी केली. परंतु महाराजांनी ते साफ नाकारून बहादुरखानाच्या तोंडाला पाने पुसली. महाराजांनी तहाची वाटाघाट, आदिलशाही मुलुखात बिनधास्तपणे स्वारी काढता यावी एवढ्यासाठीच बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या द्रुष्टीने सुरू ठेवली होती हे आता मोगलांच्या लक्षात आले. अशाप्रकारे महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले.
485 views09:08
ओपन / कमेंट
2021-07-22 12:30:59
582 views09:30
ओपन / कमेंट
2021-07-22 12:30:53 दारूगोळा जमा केला. व ते प्रतिकाराचे तयारीत होते.
यावेळ पोलिटिकल एजंट रीव्हीज् याने गडकरी लोकांस शरण आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यास गडकऱ्यांनी दाद दिली नाही. उलट बोलणी करणेस पाठवलेल्या लोकांस गडावर डांबून ठेवले. ही योजना फसलेमुळे रीव्हजने गडकरी लोकांत फूट पाडण्याचा प्रयत्न केला व जे गडकरी शरण येतील त्यांना अभय मिळेल आणि त्यांचे तक्रारींचा विचार केला जाईल असे सांगूनही पाहीले. परतुं या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
571 views09:30
ओपन / कमेंट
2021-07-22 12:30:53 २२ जुलै इ.स.१६७८
दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला व त्याची व्यवस्था लावून महाराजांनी त्याच भागातील आणखी एक बळकट दुर्ग वेल्लोरला वेढा दिला. वेल्लोरचा भुईकोट किल्ला विजयनगर साम्राज्याचा या भागातील सरदार चिन्नबोमी नायक याने बांधला होता. किल्ल्याला दुहेरी तटबंदी व जवळपास ७५ फूट रुंदीच्या खंदकाचे सरंक्षण होते. बलदंड वेल्लोर लवकर जिंकणे सहजासहजी शक्य नाही हे ओळखून महाराजांनी वेढ्याचे काम नरहरी रुद्र यांच्याकडे सोपवले व ते शेरखान पठाणाचा बंदोबस्त करण्यासाठी गेले. पुढे दक्षिण मोहीम आटोपून महाराज रायगडावर परतले तरीही वेल्लोरचा वेढा चिवट मराठ्यांनी रघुनाथपंत व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जवळपास वर्षभर सुरूच ठेवला होता. शेवटी किल्ल्यात पसरलेल्या रोगराईला कंटाळून व विजापुरावरून मदत मिळण्याची शक्यता नसल्याने किल्लेदार अब्दुलाखान याने ५० हजार होन घेऊन वेल्लोर किल्ला रघुनाथपंतांच्या हवाली केला. वेल्लोर किल्ला स्वराज्यात आला.



२२ जुलै इ.स.१६८३
(श्रावण शुद्ध ९, नवमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार रविवार)

छत्रपती संभाजी महाराजांचा चौलवर हल्ला!
पोर्तुगीज विसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांचे वकिल येसाजी गंभीर यांना नजर कैदेत टाकल्याने छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले. २ हजार घोडदळ व ६ हजार पायदळ, बरोबर घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या चौलच्या ठाण्यास वेढा घातला. छत्रपती संभाजी महाराज वेढा घालून स्वस्थ बसले नाहीत. चौलच्या तटबंदी वर मराठी सैन्याकडून अविरत होणारे तोफांचे हल्ले, आक्रमणे याचा प्रतिकार करता करता चौल तटबंदीच्या आतील पोर्तुगीज शिबंदी मेटाकुटीस आली. तेव्हा अक्षरशः शहरातील भिक्षू व नागरिक लढावयास आले. राठ्यांच्या प्रबळ हल्ल्यापुढे रडकुंडीस आलेल्या पोर्तुगिजांनी ""मेरी वर्जिन आणि सेंट स्टिफन यांची करुणा भाकण्यास सुरुवात केली. इतका प्रखर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांचा नक्शा उतरविला.



२२ जुलै इ.स.१७४२
दि.२२ जुलै इ.स.१७४२ श्रावण शु. द्वितीया शके १६६४ दुन्दूभिनाम संवत्सरी, गुरुवारी गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आले.नानासाहेब पेशवे यांचे पहिलेच पुत्र. शनिवारवाडा आनंदाच्या चांदण्यात न्हाऊन निघत होता.सर्वात जास्त आनंद झाला होता तो म्हणजे राधाबाईंना..! राधाबाईंनी त्यांच्या पणतू चे बारशाच्या वेळेस "विश्वास" असे ठेवले. राधाबाईंच्या मुलाची व नानासाहेबांच्या वडिलांची, बाजीरावांची आठवण म्हणून मुलाचे नाव विश्वासराव (विश्वनाथ) ठेवण्यात आले.



२२ जुलै इ.स.१७८५
पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख जानोजी धुळप यानी पोर्तुगीजांचे ‘सांतान' नावाचे 'फ्रिगेट' पकडून विजयदुर्गला नेल्याचा उल्लेख आढळतो. हे फ्रिगेट सुस्थितीत पोर्तुगीजांच्या हातास लागले नाही. धुळपानी त्याच्या तोफा आणि इतर उपयुक्त सामान काढून घेऊन फक्त त्याचा सांगाडा तेवढा पोर्तुगीजांच्या हवाली केला. परंतु सांगाडा मिळाल्याने पोर्तुगीजांचे समाधान झाले नाही. त्यानी पुणे दरबाराकडे त्याची नुकसान भरपायी मागितली. पुणे दरबाराने ६६४५४ रुपये, ३००० रुपयांचे लाकूड व बारा हजार रुपये उत्पन्नाची गावे नुकसान भरपायीदाखल देऊ केली. दि. ११ जानेवारी १७८० या दिवशी पुणे दरबार आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सांतान युद्धनौकेच्या नुकसान भरपायीबाबत करार झाला. तदनुसार पोर्तुगीजाना नगरहवेलीत बारा हजार रुपये उत्पन्नाची ७२ गावे मिळाली. त्यांचा ताबा पोर्तुगीजानी अनुक्रमे दि. १० जून १७८३ व दि. २२ जुलै १७८५ रोजी घेतला. स. १७८५ साली पोर्तुगीज आणि पुणे दरबार यांच्यामध्ये जो करार झाला त्यात नगरहवेलीतील हिंदूना धर्मस्वातंत्र्य असावे, गोहत्त्येस बंदी, हिंदूंच्या परंपरागत चालीरितींचे व देवालयांचे संरक्षण वगैरे अटींचा समावेश होता.



२२ जुलै इ.स.१८४४
१८४४ चा गडकरी उठाव
उठावाची पहीली ठिणगी ही २२ जुलै १८४४ रोजी किल्ले भुदरगड येथे पडली. भुदरगडच्या गडकऱ्यांनी मामलेदाराला गडावर घेण्याचे नाकारले. त्यातून बंडास सुरूवात झाली. पाठोपाठ गडहिंग्लज जवळील सामानगडारील गडकऱ्यांनी बंडाचे निशाण उभारले. गडाचे दरवाजे बंद करून त्यांनी सरकारी अधिकारी लोकांना गडावर येण्यास मज्जाव केला. या बंडाचे नेतृत्व रामजी जाधव, दौलतराव घोरपडे, बापुजी बाजीराव सुभेदार, गोविंद फडणीस, गणेश मुजुमदार, यशवंत फडणीस, मुंजाप्पा कदम, जोतिबा आयरे या लोकांनी केले. या बंडाची बातमी समजताच कोल्हापुराहुन रताजीराव हिम्मतबहाद्दर चव्हाण व हणमंतराव सरलष्कर हे सामान गडावर चालुन गेले. गडकर्यांनी या दोघांचा पराभव केला. यामुळे गडकरी लोकांचा उत्साह वाढला. सभोवतालच्या परिसरातील लोकांनी गडकरी लोकांस मिळण्यास सुरूवात केली.
427 views09:30
ओपन / कमेंट
2021-07-22 12:30:53 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

२२ जुलै इ.स‌.१६५७
मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

२२ जुलै इ.स.१६६६
राजियांनी राजगडाहून आग्राकडे निघताना बरोबर बराच खजिना घेतला होता. राजांना कैद केल्यावर ह्या कैदेतून ते आग्रातील अमीर उमराव बडी मंडळी यांना भेटीदाखल अनेक वस्तू पाठवू लागले. शहरात राजेविषयी चांगले मत तयार झाले. दखनीराजा चांगला दिलदार असल्याचा बोलबाला होऊ लागला. याच सुमारास औरंगजेबाने आपल्या लवाजम्यासह आग्रा शहराबाहेर जाऊन शिकार करण्याचे ठरविले. औरंगजेब दिनांक २२ जुलैपासून आग्रा शहराबाहेर राहिला. त्यामुळे आग्यातील कारभार थंड पडला होता. छत्रपती शिवाजीराजांच्या डेऱ्याभोवतीचा पहारादेखील ढिला पडला होता. शाहीदरबार काही दिवस बंद असल्याने आग्रा शहरात सुटीचे वातावरण होते. यावेळी राजे मिठाईचे पेटारे भरून आग्रातील अमीर उमरावांकडे घरपोच करीत होते. प्रथमतः फुलादखाना कडून हे पेटारे तपासले जात होते. त्याला व त्यांच्या
पहारेवाल्यांनाही महाराजांनी मिठाई दिली असणार असे पेटारे सतत जाऊ लागले. काही दिवस लोटल्यावर राजांच्या मनात आले की, आपल्या बरोबर राहत असलेले एक थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या हवेलीच्या बागेत परमानंदांची यथोचित पूजा केली. त्यांना एक हत्ती व हौबासह एक हत्तीण, दोन उत्तम घोडे व वस्त्रालंकार दिले. त्यांच्यासाठी ठेवून घेतलेले चाळीस स्वार त्यांच्या बरोबर
दिले; आपल्याजवळील मौल्यवान कापड चोपड बांधून राजियांनी कवींद्रापाशी दिले. कवींद्राना परवाना मिळालेला होता. त्याप्रमाणे ते राजांचा निरोप घेऊन निघाले. व आग्रा शहराच्या पश्चिमेकडे सुमारे २३ मैलांवर असलेल्या फत्तेपूर-शिक्री या गावी पोहचले.



२२ जुलै इ.स.१६७५
(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९७, संवत्सर राक्षस, वार गुरुवार)

महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी!
किल्ले पुरंदरला बहादुरखानाच्या वकिलांना परत पाठविले असले तरी महाराजांनी बहादुरखानाशी तहाची बोलणी सुरूच ठेवलेली होती असे दिसते. अखेरीस महाराजांनी मोगलांपासून घेतलेला मुलुख व १७ किल्ले मोगलांना परत करावेत दख्खनची सरदेसाईपणाची वृत्ती महाराजांना मिळावी, जुन्नरचा मोगली सुभेदार कल्याण-भिवंडीला यावा अशी तहाची कलमे ठरली. (युवराज शंभुराजेंचे पंच हजारी मनसबदारीचे कलम बाद झाले.) या तहावर महाराजांच्या वकिलाने बहादुरखानाची सही घेतली. बहादुरखानाने मोठ्या आनंदाने तहाचे वृत्त औरंगजेब बादशहाकडे रवाना केले. औरंगजेब बादशहा यावेळी वायव्य सरहद्दीवर होता. छत्रपती शिवाजी महाराजांशी यशस्वी तह घडवून आणल्याबद्दल औरंगजेब बादशहा बहादुरखानावर प्रसंन्न झाला. बहादुरखानाची बढती करण्यात येऊन तो आता सप्त हजारी मनसबदार झाला. औरंगजेब बादशहाने त्याला एक हत्तीही बक्षिस दिला. त्याचे भाऊ व मुले यांचाही औरंगजेब बादशहाने गौरव केला. बहादुरखानही या सन्मानामुळे खुष झाला. त्याने या निमित्ताने बहादुरगड येथे प्रचंड उत्सव साजरा केला. मेजवान्या, बैठकी यांची एकच रेलचेल उडाली. या आनंदोत्सवात बहादुरखानाने ३० हत्ती, ५०० घोडे, २००० वस्त्रे, तरवारी व अन्य शस्त्रे देणगी दाखल आपल्या सरदार, आधिकारी व सेवक वर्गाला दिल्या. परंतु हा भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. पहिल्या पंधरवड्यात बहादुरखानाने महाराजांकडे कबूल केलेले १७ किल्ले ताब्यात देण्याबद्दल मागणी केली. परंतु महाराजांनी ते साफ नाकारून बहादुरखानाच्या तोंडाला पाने पुसली. महाराजांनी तहाची वाटाघाट, आदिलशाही मुलुखात बिनधास्तपणे स्वारी काढता यावी एवढ्यासाठीच बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्याच्या द्रुष्टीने सुरू ठेवली होती हे आता मोगलांच्या लक्षात आले. अशाप्रकारे महाराज बहादुरखानाच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी झाले.

450 views09:30
ओपन / कमेंट