Get Mystery Box with random crypto!

" छञपती श्री शिवाजी महाराज "

टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
टेलीग्राम चैनल का लोगो chatrapat — " छञपती श्री शिवाजी महाराज "
चैनल का पता: @chatrapat
श्रेणियाँ: जानवरों , ऑटोमोबाइल
भाषा: हिंदी
ग्राहकों: 3.58K

Ratings & Reviews

4.00

3 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

2

4 stars

0

3 stars

0

2 stars

1

1 stars

0


नवीनतम संदेश 139

2021-08-12 09:25:42 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१२ ऑगस्ट इ.स.१३४७
बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही.

महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला.

इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या सरदारांनी हसनच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध बंड केले. हा उठाव यशस्वी झाला आणि दख्खनचा प्रांत स्वतंत्र झाला. पुढे १२ ऑगस्ट १३४७ रोजी दक्षिणेला हसनने जे राज्य स्थापन केले त्याला इतर मुसलमान "ब्राह्मणाचे राज्य" म्हणत. त्या "बम्मनशाही"चे नंतर झाले बहमनशाही.....

या राज्याची प्रजा मुख्यतः हिंदु होती.हसन गंगू बहमनशाहा अर्थातच हिंदूंच्या बाबतीत काहिसे मवाळ धोरण स्वीकारत होता जे त्याच्या सरदारांना बिलकुल पसंत नव्हते. पण शेजारच्या प्रबळ अशा विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा केसही ते वाकडा करू शकले नाहीत इतके प्रभावशाली साम्राज्य हरीहर आणि बुक्क या दोन बंधूंनी दक्षिण भारतात तुंगभद्रेच्या काठावर स्थापन केले होते.

आर्थिक कुरबुरी, प्रशासकीय कामात ढवळाढवळ इत्यादी कारणांमुळे त्याचा परिणाम त्याच्या विरोधात बंडखोरी होण्यात झाला. ११ फेब्रुवारी १३५८ रोजी बहमनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगू बहमनशाहाचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूनंतर १३५८ मध्ये बहमनी सुलतानांपैकी हसन गंगू बहमनशाहचा मुलगा महंमदशाह बहमनी सुल्तान झाला. याने तेलंगणचा राजपुत्र विनायकदेव याची जीभ छाटली होती आणि वेलिंगपट्टणच्या किल्ल्यावरून आगीत फेकून जिवंत जाळले होते. कर्नाटकात त्याने अदोनीजवळ सत्तर हजार माणसांची कत्ल केली.माणसे मारायची याला फार मोठी हौस होती. कर्नाटकाच्या सरहद्दिजवळ एकाच वेळी खूप मोठी कत्तल केली, काही लाख माणसे मारली. ही कत्तल इतकी मोठी होती की हा मुलुखच कित्येक वर्षे निर्मनुष्य आणि ओसाड पडला होता. अत्यंत सुंदर मंदिरे याने फोडून टाकली,आयुष्येच्या आयुष्ये खर्च करुन लिहिलेले अनमोल ग्रंथ जाळले. उध्वस्त केलेल्या मंदिरांवर अरबी भाषेत लिहिलेले शिलालेख झळकू लागले. 'बुत कदे शुद् मस्जिद' आणि 'बना कर्दे मस्जिद तबा कर कुनिश्त' अशा जाहिरनाम्यात.... याचा अर्थ असा की मूर्ती फोडून टाकून येथे ही मशीद बांधली.

पुढे त्याच्यानंतर अल्लाउद्दीन मुजाहिदशाह बहमनी तिसरा सुलतान झाला. हा गादीवर येतांच विजयानगरच्या राजाबरोबर युध्द सुरू झाले. इस १३७८ मध्ये विजयनगर साम्राज्याने बहमनी सुलतानांचा प्रचंड पराभव केला. १६ एप्रिल १३७८ रोजी सुल्तान अल्लाउद्दीन मुजाहिदशाह विजयनगरच्या राज्याने केलेला पराभव घेऊन परतत असताना त्याचा चुलता दाऊदखान याने खून करवला. यातील बहमनी सुलतानांच्या काही निर्णयांमुळे महाराष्ट्रातील काही शहरे भरभराटीस आली. आता हेच पहा, बहमनी साम्राज्यातील ९वा सुलतान महंमदशाह बहमनीने २२ सप्टेंबर १४२२ रोजी गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली; त्यामुळे आजच्या महाराष्ट्रातील उदगीर या शहराचे महत्व वाढून भरभराट झाली. बहमनी साम्राज्यातील क्रूरकर्मा म्हणून हुमायून बहमनीची इतिहासात ख्याती आहे. त्यामुळे त्याला जालीम असे म्हणत. त्याचा त्याच्या हुज-यांनी ४ सप्टेंबर १४६१ रोजी खून पडला.

लहान लहान हिंदु राज्ये जिंकून बहामनी राज्य वाढले होते. बहमनी साम्राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकले व नंतर त्याचीच फ़ाळणी झाली आणि विशेष म्हणजे बहमनी साम्राज्यातीलच ५ सरदारांनी बंड करून बहमनी साम्राज्याची विभागणी करून आपापसात वाटून घेतले.

य राज्याचे खालील पाच तुकडे झाले.
यूसुफ आदिलखान - विजापूर(आदिलशाही),
मलिक अहमद निजामशाहा - अहमदनगर (निजामशाही),
कुली कुतुब उल मुल्क - गोवळकोंडा (कुतुबशाही),
फ़तेउल्लाह इमादशाह- एलीचपुर (ईमादशाही) व
कासीम बेरीद - बिदर (बेरीदशाही) या नावाच्या या पाच शाह्या आपल्या ओळखीच्या आहेतच. शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या याच त्या आदिलशाही,निजामशाही, कुतुबशाही सुलतानशाह्या बहमनी साम्राज्यातून फ़ुटून निर्माण झाल्या होत्या.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
357 views06:25
ओपन / कमेंट
2021-08-11 08:14:24
144 views05:14
ओपन / कमेंट
2021-08-11 08:14:11 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ आगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य ६, षष्ठी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शनिवार)

आग्रा येथे नजरकैदेत महाराजांच्या आजारपणाची औरंगजेब बादशहास बातमी!
औरंगजेब बादशहास त्याच्या हेरांकरवी महाराज आजारी असल्याची बातमी समजली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

११ ऑगस्ट इ.स.१६७८
छत्रपती श्री शिवरायांनी
त्यांचे सावत्र बंधु व्यंकोजीराजे यांची पुन्हा एक वर्षा नंतर तंजावर येथे गुप्त भेट घेतली. हें स्वराज्य व्हावे ही तो श्री ची इच्छा हेच विचार मनात ठेवून छ. शिवरायांनी भगवा रोवत जाण्याची वाटचाल सुरूच ठेवली आता लक्ष दक्षिणेकडे,आपले स्वराज्य दक्षिणेतही वाढवले पाहिजे म्हणून छ.शिवरायांनी आपले बंधु व्यंकोजी राजे यांची भेट घेतली.



११ ऑगस्ट इ.स.१८०३
शके १७२५ श्रावण व .नवमी फिरंगी दि.११ ऑगस्ट इ.स.१८०३ रोजी इंग्रजी लोकांनी अहमदनगर चा किल्ला लांच देऊन घेतला. ख्रिस्ती शकाच्या एकोणिसाव्या शतकातील पहिल्या दशकापासून मराठी राज्यास उतरती कळा लागून राहिली होती.शिंदे-होळकर आदी मराठे सरदारांचा पराभव करण्याकडे इंग्रज वळले होते.अहमदनगर चा किल्ला शिंदे यांच्या ताब्यात होता.इंग्रजांची राजनीती मोठी धूर्त पणाची होती.श्रावण व.५ रोजी वेढया चे काम सुरू झाल्यावर जनरल वेलस्ली याने जाहीरनामा प्रसिद्ध केला की शिंदे-भोसले यांच्याविरुद्ध आमना सामना होणार आहे,प्रजेविरुद्ध नाही.जणू प्रजा आणि शिंदे-भोसले वेगळेच होते! दुसऱ्या दिवशी वेढ्याचे काम जोरात सुरू झाले.किल्ल्यावर शिंदे यांच्याकडील पायदळांतील काही लोक होते.थोडे घोडेस्वार असून किल्ल्याचे रक्षण करणारे नेहमीचे शिपाई पण होते.या सर्वांनी किल्ला सोडण्यास नकार दिल्यावर इंग्रजांनी किल्ल्याच्या तटास वेढा दिला. तट आणि बुरुज उंच असल्याने त्यांचे काही चालले नाही.परंतु निकाराचा प्रयत्न करून आणि मराठ्यांच्या गोळीबारास तोंड देऊन इंग्रज भिंतीवरून शहरात आत घुसले.तेव्हा इंग्रजांचे नेतृत्व वेलस्ली हा इंग्रज करत होता.किल्ल्याची तट व्यवस्था मजबूत असल्या कारणाने किल्ला मिळवणं त्याला शक्य नव्हतं म्हणून त्याने भिंगार गावा जवळ असलेल्या देशमुखाला इंग्रजांनी वश करून घेतले.आणि त्याला चार हजार रुपये लांचं देऊ केली.त्याबरोबर हल्ला कोठे करावा याचे ज्ञान इंग्रजांना मिळाले श्रावण व.नवमी रोजी सहजा सहजी नगरचा किल्ला शत्रूच्या हातात पडला



११ ऑगस्ट इ.स.१९०८
भारतातील सर्वात तरूण वयाचे तसेच सशस्त्र क्रांतीत बाँबचा उपयोग करणारे पहिले क्रांतिकारक शहीद खुदीराम बोस यांना विनम्र अभिवादन...

.

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
160 views05:14
ओपन / कमेंट
2021-08-10 10:27:09
360 views07:27
ओपन / कमेंट
2021-08-10 10:26:36 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१० ऑगस्ट इ.स.१६६०
(श्रावण पोर्णिमा, शके १५८२,संवत्सर शार्वरी, वार शुक्रवार)

सिद्दी जौहरचे परत आक्रमण!
"छत्रपती शिवराय" किल्ले पन्हाळ्याच्या वेढ्यातून निसटल्यावर त्यांच्या पाठलागावर "सिद्दी जौहर" स्वराज्यात शिरला होता. त्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी महाराजांनी मावळ्यांना काही सूचना देऊन मावळ्यांची एक तुकडी सिद्दी जौहरचा सामना करण्यासाठी पाठवली.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

१० ऑगस्ट इ.स.१६६६
(श्रावण वद्य ५, पंचमी, शके १५८८, संवत्सर पराभव, वार शुक्रवार)

महाराजांनी आजारपणाचे सोंग घेतले!
"छत्रपती शिवराय" आग्रा कैदेत असताना त्यांनी आजपासून आजारपणाचे सोंग घेतले. त्यांच्या या व्यूहरचनेची औरंगजेब बादशहाला कसलीही कल्पना नव्हती.



१० आगस्ट इ.स.१६८०
(श्रावण वद्य ११, एकादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार मंगळवार)

इंग्रजांच्या वखारीत दंगल!
सिद्दीच्या लोकांची दंडेली सुरूच होती. एका प्रकरणात सिद्दी यांना एका इंग्रज सराफाकडून १८ हजार अशरफ्या घ्यावयाच्या होत्या, त्यासाठी इंग्रजांच्या बरोबरच्या वादात वखारीत दंगल झाली. अखेर इंग्रजांनी तोफा डागल्या तेव्हा सिद्दीचे लोक पळून गेले.



१० ऑगस्ट इ.स. १७५५
इस.१७५३ ते १७५५ श्रीमंत रघुनाथराव उर्फ राघोबादादांची दुसरी स्वारी उत्तरेत झाली.त्यांच्या नेतृत्वाखाली मराठयांनी राजपुतांना, कुंभेरी इथे जबरी खंडण्या वसूल करून चांगलीच दहशत निर्माण केली होती.जून ते डिसेंम्बर १७५४ दरम्यान राघोबादादा दिल्लीची व्यवस्था पाहण्यात दिल्ली मुक्कामी होते.३ मार्च रोजी सर्व व्यवस्था करून राघोबादादा परतीच्या प्रवासाला निघाले.पुष्कर, ग्वाल्हेर असा प्रवास करत राघोबादादासाहेब १० ऑगस्ट इस. १७५५ रोजी पुण्यात दाखल झाले.याच दरम्यान मराठ्यांचा उत्तरेतील आणखी एक बलाढ्य बुरुज कोसळला. जयप्पा शिंदे यांचा नागोर येथे खून झाला. एकंदरीत या स्वारीत मराठयांचे उत्तरेत बरेच वर्चस्व वाढले होते. येथील भौगोलिक, सामाजिक, आणि राजनैतिक, परिस्थिती चा अंदाज त्यांना आला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
376 views07:26
ओपन / कमेंट
2021-08-09 11:04:07
417 views08:04
ओपन / कमेंट
2021-08-09 11:04:02 आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

९ ऑगस्ट इ.स.१६५४
(श्रावण पोर्णिमा, शके १५७२, संवत्सर नंदन, वार सोमवार)

महाराजांनी निळोजीपंत महादजी सरनाईक यांस इमानपत्र दिले.
मार्च १६५४ मध्ये किल्ले पुरंदरचे महादजी निलकंठराव सरनाईक मृत्यू पावले.ही बातमी शिवाजी महाराजांनी शहाजीराजेना कळवली.शहाजीराजेनी यावर महादजींच्या चारही पुत्रांना सांत्वनाचे पत्र पाठवले होते.या दुःखद प्रसंगी शिवाजी महाराजांनीही महादजींचे वडील पुत्र निळोपंत याना स्वतंत्र पत्र पाठवले होते. ते असे,"जैसे काही राऊ गोसावी(महादजीपंत)आम्हांसी वर्तत होते तैसेंच तुम्हीही आम्हांसी वर्तत जाणे व आम्ही जैसे काही राजश्री राऊगोसावी याचे चालवीत होतो तैसेच तुमचेही चालवून.एविशई आम्हास श्रींची व राजेश्री महाराज साहेबाच्या पायाची व सौभाग्यवती मातूश्रीसाहेबांच्या पायची आण असे.व येविशई श्रींचा दवणा पाठविला असे तो घेणे व जोपर्यंत तुम्ही आम्हासी इमाने वर्तल तोपर्यंत आम्हीही तुम्हांसी इमाने वर्तीन. तुम्हापासोन इमानात अंतर पडलिया आमचाही इमान नाही."


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

९ आगस्ट इ.स.१६७६
(श्रावण शुद्ध एकादशी, शके १५९८, संवत्सर नल, वार बुधवार)

मोरोपंत पिंगळे दंडाराजपुरीस!
मोरोपंत पिंगळे दंडाराजपुरीस १० हजार फौज घेऊन काबीज करण्यासाठी निघाले. तोफांचा मारा होण्यास अडचण येऊ म्हणून किनाऱ्याभोतीची झाडे तोडून तसेच होड्यांवर आवश्यक तेवढा तोफगोळा घेऊन जय्यत तयारी करून मोरोपंत पिंगळे दंडाराजपुरीस आले.



९ ऑगस्ट इ.स.१६८८
१६८८ सालातल्या जुलै महिन्याच्या शेवटी सैय्यद अब्दुल्ला खान (नंतरच्या काळात दिल्लीच्या राजकारणात प्रसिद्ध असलेल्या सैय्यद बंधूंचा बाप) याने आपला मुलगा हसनअलीखान याला सैन्य देऊन बागलाणातील होलगड किल्ला जिंकण्यासाठी पाठवले होते. होलगडाच्या मराठी किल्लेदाराने हसन अलिखानाच्या सैन्याशी चिवट झुंज दिली. पण संख्येने अधिक असणाऱ्या मुघल सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाही. मुघलांनी हा किल्ला जिंकल्यावर सैय्यद अब्दुल्लाखानाने होलगडाच्या किल्ल्याची सोन्याची किल्ली बादशहा औरंगजेबाकडे पाठवून दिली.



९ ऑगस्ट इ.स.१७८०
दक्षिणेत हैदरअलीखानाने मोठाच उपद्रव मांडला होता. इकडे इंग्रजही युद्धाच्याच तयारीत होते. एकाच वेळी या दोन्ही शत्रूशी लढणे हे सध्या तरी आपल्याला शक्य नसल्याचे नाना-महादजींनी ओळखले. तिकडे निजामही इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन करत होताच. म्हणून मग नानांनी नागपूरकर भोसल्यांचे मन वळवून हैदरअलीशी इंग्रजांविरोधात तहाच्या वाटाघाटी सुरू केल्या. शेवटी दि. २० फेब्रुवारी १७८० रोजी पेशवे आणि हैदरअली यांच्यात तह झाला. त्या तहाची काही कलमे तयार केली गेली. शेवटी दि. ९ ऑगस्ट १७८० रोजी हा तह कायम करण्यात आला. त्यामुळे आता ब्रिटिशांच्या विरोधात श्रीमंत पेशवे, नागपूरकर भोसले, हैद्राबादकर निजाम आणि म्हैसुरचा हैदरअली ही चौकडी एकत्र आली. पेशव्यांनी पश्चिम, भोसल्यांनी उत्तर, निजामाने पूर्व तर हैदराने दक्षिण दिशेला कामगिरी करावी, असे ठरले.



९ ऑगस्ट इ.स.१९२५
९ ऑगस्ट भारतीय क्रांतिदिन
भारतीय स्वातंत्र्यलढा – क्रांतिकारकांनी लखनौजवळ काकोरी येथे रेल्वेवर दरोडा टाकला इंग्रजाना देशाबाहेर घालवण्‍यासाठी चंद्रशखेर आजाद आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी काकोरीजवळ रेल्‍वे लुटली. ९ ऑगस्‍ट १९२५ काकोरी कट म्‍हणून ओळखले जाते. काकोरी कटामध्‍ये सहभागी झालेल्‍या सर्वच क्रांतिकारकांना पकडण्‍यात आले. यापैकी क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, अशफाक उल्‍लाह खॉं आणि राजेंद्र प्रसाद लाहिडी यांना १९ डिसेंबर १९२७ मध्‍ये फासी देण्‍यात आली.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
454 views08:04
ओपन / कमेंट
2021-08-08 08:04:05
58 views05:04
ओपन / कमेंट
2021-08-08 08:03:57 ते तटबंदी चढून किल्यावर गेले तेव्हा त्यांना लगेच पकडून पोर्तुगिजांनी त्यांचा अनन्वित छळ करून त्यांच्या येण्याचा उद्देश त्यांच्याकडून वदवून घेतला आणि त्यांना कंठस्नान घातले.



८ आगस्ट इ.स.१७९०
मराठ्यांनी लुनी नदी ओलांडली. आणि त्यांच्या फौजा मेडत्यावर चालून आल्या. मराठी फौजेने राजपुतांना हैराण करावयास सुरूवात केली. द बुआन्यचा तोफखाना मात्र अजूनही नदीच्या अलिकडेच होता. मारवाडी फौजेचे सेनापती गंगाराम भंडारी होते. मराठ्यांना लुनी नदीच्या अलीकडेच अडविण्याचा त्यांचा डाव होता. पण तो काही सफल झाला नाही.



८ ऑगस्ट इ.स.१८०३
इंग्रजांनी आपल्याला मराठ्यांशी युद्ध करावे लागणार हे गृहीत धरूनच जोराची तयारी चालविली होती. दक्षिणेत जनरल वेलस्लीच्या हाताखाली ३६ हजार सैन्य होते. जनरल वेलस्लीला दक्षिणेतील फौजांचा सरसेनापती म्हणून जाहीर केले होते. कृष्णा-तुंगभद्रा दुआबात जनरल स्टुअर्ट आपल्या ८,००० सैन्यासह युद्धाच्या तयारीने तळ देऊन होता. आजुबाजूचे पाळेगार, बंडखोर, यांना ताब्यात ठेऊन जनरल वेलस्लीला लागेल त्यावेळी मदत करण्याचे त्यास हुकूम दिले होते. ७ ऑगस्ट १८०३ रोजी जनरल वेलस्ली बरोबर ९ हजार सैन्य घेऊन आणि कर्नल स्टीव्हेन्सन ह्याचे ८ हजार सैनिक ही दोन्ही सैन्ये अहमदनगरच्या किल्याजवळ येऊन थडकली. निजामाचे १५ हजार सैन्य, अप्पा देसाई निपाणकर यांजकडील ८ हजार सैन्य आणि बापू गोखले यांनी जनरल वेलस्लीला मदत करावयाची असे हुकूम गव्हर्नर जनरलने दिले होते. सुरतजवळ कॅप्टन मरे आपल्या ८ हजार सैन्यानिशी दक्षिणेत निघण्याच्या तयारीत होता. जनरल लेकला उत्तरेतील सैन्याचे अधिपत्य देऊन कानपूर व लखनौ येथील सैन्यास शिंद्यांवर हल्ला करण्यासाठी ठेवले होते. शिंदे दक्षिणेत पुण्याच्या दिशेने येत होते, त्यास अडवून धरण्यासाठी त्यांच्या ताब्यातील अहमदनगरचा किल्ला काबिज करण्याचा बनाव वेलस्लीने ८ ऑगस्ट १८०३ घडवून आणला.



८ ऑगस्ट इ.स.१८३१
उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले.



८ ऑगस्ट इ.स.१९४२
भारताला स्वातंत्र्य मिळणे हे केवळ भारतासाठीच नाही तर जगाच्या शांतीसाठी गरजेचे आहे.शके १८६४ आषाढ व.१२ फिरंगी दि.८ ऑगस्ट इ.स.१९४२ या दिवशी रात्री दहा वाजता प्रसिद्ध असा "चले जाव" ठराव पास झाला. 'चले जाव'ची घोषणा केली गेली आणि 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे', असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला.



YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.



लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

facebook page
https://www.facebook.com/shivhindvi

Instagram
https://www.instagram.com/shivhindvi/

Whatsapp
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1



" हर हर महादेव जय श्रीराम "
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"
62 views05:03
ओपन / कमेंट
2021-08-08 08:03:57 आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

८ ऑगस्ट इ.स.१६४८
(श्रावण अमावास्या, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार मंगळवार)

छत्रपतींचा बुद्धिबळाचा डाव
आदिलशाहपुढे पदर पसरून राजांच्या प्राणांची भीक मागणं! स्वराजाच्या शपथा विसरून जाणं अन् मिळविलेलं स्वराज्य पुन्हा आदिलशाहच्या कब्जात देऊन टाकणं. नाहीतर शहाजी राजांचा मृत्यू. स्वराज्याचा नाश आणि शिवाजीराजांच्याही अशाच चिंधड्या उडालेल्या उघड्या डोळ्यांनी पाहणं हे आऊसाहेबांच्या नशीबी नव्हतं ! शिवाजीराजांनी स्वराज्यावर याचवेळी चालून आलेल्या फत्तेखानाचा प्रचंड पराभव केला होता. सुभानमंगळ , पुरंदर गड , बेलसर आणि सासवड या ठिकाणी राजांनी आपली गनिमी काव्याची कुशल करामत वापरून शाही फौजा पार उधळून लावल्या होत्या. सह्याद्रीच्या आणि शिवाजीराजांच्या मनगटातील बळ उफाळून आलं होतं.

अन् त्यामुळेच आता कैदेतले शहाजीराजे जास्तच धोक्यात अडकले होते. कोणत्याही क्षणी संतापाच्या भरात शहाजीराजांचा शिरच्छेद होऊ शकत होता, नाही का ?

पण शिवाजीराजांनी एका बाजूने येणाऱ्या आदिलशाही फौजेशी झुंज मांडण्याची तयारी चालविली होती , अन् त्याचवेळी शहाजीराजांच्या सुटकेकरताही त्यांनी बुद्धीबळाचा डाव मांडला होता. राजांनी आपला एक वकील दिल्लीच्या रोखाने रवानाही केला. कशाकरता ? मुघल बादशाहशी संगनमत करून मोघली फौज दिल्लीहून विजापुरावर चालून यावी , असा आदिलशाहला शह टाकण्याकरता.

राजांचा डाव अचूक ठरला. दिल्लीच्या शहाजहाननं विजापुरावरती असं प्रचंड दडपण आणलं की , शहाजीराजांना सोडा नाहीतर मुघली फौजा विजापुरावर चाल करून येतील! वास्तविक दिल्लीचे मोगल हे काही शिवाजीराजांचे मित्र नव्हते. पण राजकारणात कधीच कुणी कुणाचा कायमचा मित्रही नसतो आणि शत्रूही नसतो. उद्दिष्ट कायम असतं.

हे शिवाजीराजांचं वयाच्या अठराव्या वर्षीचं कृष्णकारस्थान होतं. अचूक ठरलं. विजापूरच्या आदिलशहाला घामच फुटला असेल! शहाजीराजांना कैद करून शिवाजीराजांना शरण आणण्याचा बादशाहचा डाव अक्षरश: उधळला गेला. नव्हे , त्याच्याच अंगाशी आला. कारण समोर जबडा पसरलेला दिल्लीचा शह त्याला दिसू लागला. त्यातच भर पडली फत्तेखानाच्या पराभवाची. चिमूटभर मावळी फौजेनं आपल्या फौजेची उडविलेली दाणादाण भयंकरच होती.

मुकाट्यानं शहाजीराजांची कैदेतून सुटका करण्याशिवाय आदिलशहापुढे मार्गच नव्हता. डोकं पिंजूनही दुसरा मार्ग बादशहाला सापडेना. त्याने दि. १६ मे १६४९ या दिवशी शहाजीराजांची सन्मानपूर्वक मुक्तता केली. अवघ्या सतरा-अठरा वर्षाच्या शिवाजीराजांची लष्करी प्रतिभा प्रकट झाली. मनगटातलं पोलादी सामर्थ्यही प्रत्ययास आलं. वडीलही सुटले. स्वराज्यही बचावलं. दोन्हीही तीर्थरुपच. किशोरवयाच्या पोरानं विजापूर हतबल केलं. अन् ही सारी करामत पाहून इतिहासही चपापला. इतिहासाला तरुण मराठ्यांच्या महत्त्वाकांक्षा क्षितीजावर विस्मयाने झुकलेल्या दिसल्या.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1

८ आगस्ट इ.स.१६४८
(श्रावण अमावास्या, शके १५७०, संवत्सर सर्वधारी, वार मंगळवार/

उत्रावळीच्या केदारजी खोपडे देशमुखाला आदिलशाही फर्मान!
"मुहम्मद आदिलशहा केदारजी खोपडे देसाई तर्फ भोर किल्ले रोहिडा. फतहखान खुदाबंदखान यांस कोंढाणा किल्ल्याच्या तर्फेस मसलत फर्मावली आहे तरी हे फर्मान पोहोचताच, त्याने (केदारजी) स्वार व प्यादे यासह उपर्युक्त खानाच्या जवळ जाऊन, त्याच्या आज्ञेत राहून दिवानची मसलत करावी. म्हणजे उपर्युक्त खानाच्या लिहिल्यानुसार निष्ठा व्यक्त होऊन तीप्रमाणे उत्कर्ष होईल. याबाबतीत विसर करण्याचा परिणाम चांगला होणार नाही. बरी ताकीद जाणून फर्मानाप्रमाणे अंमल करावा.



८ ऑगस्ट इ.स.१६७६
छत्रपती शिवरायांच्या सूचनेवरून "किल्ले महीपतगड" वर हवालदार "दसमाजी नरसाळा" यांस तर "किल्ले सज्जनगड" वर हवालदार "जिजोजी काटकर" यांस कारभाराविषयी पत्र. ज्यात महाराज जिजोजीला म्हणतात, "रामदास गोसावी गडावर येतील, त्यांना रहायला चांगली जागा करून द्या, त्यांना काय हवं नको पहा, त्यांची विचारपूस करा, जितके दिवस राहू म्हणतील तितके दिवस राहू द्या आणि जेव्हा जाऊ म्हणतील तेव्हा जाऊद्या. या कामात कसलीही हयगय होऊ देउ नका !! असंच पत्र, याच तारखेचं महिपतगडचा किल्लेदार दसमाजी नरसाळा यालाही दिलंय.



८ ऑगस्ट इ.स.१६८३
दिनांक ८ ऑगस्टच्या सकाळी मराठ्यांनी चेऊलवर हल्ला केला. मोठमोठ्या शिड्या लावून किल्ल्याच्या तटावर चढून जाण्याचा प्रयत्न केला. हे कळताच पोर्तुगिजांनी मोठा भोंगा वाजवून आवाज काढला. त्यावेळी शहरातील लोक धावत येऊन त्यांनी शिड्या फेकून दिल्या. मराठ्यांनी इ. स. १६८३ मध्ये चौलच्या तोंडाशी असलेला कुर्लाई हा लहानसा किल्ला जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. मराठ्यांनी किल्ल्याचे तट चढून जाण्यासाठी ६ गुप्तहेर पाठविले.
55 views05:03
ओपन / कमेंट