Get Mystery Box with random crypto!

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष १२ ऑगस्ट इ.स.१३४७ बहमनी स | " छञपती श्री शिवाजी महाराज "

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

१२ ऑगस्ट इ.स.१३४७
बहमनी साम्राज्याची स्थापना. हसन गंगू बहमनशाह पहिला सुलतान झाला. हिंदुस्तानातील पहिली शिया-मुस्लिम राजवट म्हणजे बहमनशाही.

महंमद तुघलकचा सेनापती झाफर खान हा तुघलकांना न जुमानता पुर्वीच स्वतंत्र झाला होता. या जाफर खानाची हकीकत मोठी मजेची आहे. दिल्लीला एक विद्वान पंडीत होता. त्याचे नाव होते गंगाधरशास्त्री वाबळे. नावावरून हा मराठी असावा असे वाटते. हा बराच श्रीमंत होता व त्याने दिल्लीच्या आसपास शेतीवाडी खरेदी करून आपले व्यवस्थीत बस्तान बसवले होते. याच्याकडे एक गरीब पण अत्यंत अफगाणी हुशार मुलगा कामाला होता त्याचे नाव हसन. याच्यावर सगळे ब्राह्मणी संस्कारच झाले होते. एक दिवस या मुलाला शेतात काम करताना काही सोने भरलेले हंडे सापडले ते त्याने प्रामाणिकपणे मालकाला परत केले. त्याची हुशारी व प्रामाणिकपणा बघून बघून वाबळे शास्त्र्यांनी त्याच्या इतर शिक्षणाची सोय केली व तो एक दिवस तुघलकांच्या सेनेचा दक्षिणेत सेनापती झाला.

इ.स. १३४६ च्या अनागोंदीमध्ये दिल्लीच्या सरदारांनी दख्खन प्रांताची लूट आणि नासधूस केली. ह्या घटनेनंतर दख्खनच्या सरदारांनी हसनच्या नेतृत्वाखाली दिल्लीच्या बादशाहाविरुद्ध बंड केले. हा उठाव यशस्वी झाला आणि दख्खनचा प्रांत स्वतंत्र झाला. पुढे १२ ऑगस्ट १३४७ रोजी दक्षिणेला हसनने जे राज्य स्थापन केले त्याला इतर मुसलमान "ब्राह्मणाचे राज्य" म्हणत. त्या "बम्मनशाही"चे नंतर झाले बहमनशाही.....

या राज्याची प्रजा मुख्यतः हिंदु होती.हसन गंगू बहमनशाहा अर्थातच हिंदूंच्या बाबतीत काहिसे मवाळ धोरण स्वीकारत होता जे त्याच्या सरदारांना बिलकुल पसंत नव्हते. पण शेजारच्या प्रबळ अशा विजयनगरच्या हिंदू साम्राज्याचा केसही ते वाकडा करू शकले नाहीत इतके प्रभावशाली साम्राज्य हरीहर आणि बुक्क या दोन बंधूंनी दक्षिण भारतात तुंगभद्रेच्या काठावर स्थापन केले होते.

आर्थिक कुरबुरी, प्रशासकीय कामात ढवळाढवळ इत्यादी कारणांमुळे त्याचा परिणाम त्याच्या विरोधात बंडखोरी होण्यात झाला. ११ फेब्रुवारी १३५८ रोजी बहमनी साम्राज्याचा संस्थापक हसन गंगू बहमनशाहाचा मृत्यु झाला. त्याच्या मृत्यूनंतर १३५८ मध्ये बहमनी सुलतानांपैकी हसन गंगू बहमनशाहचा मुलगा महंमदशाह बहमनी सुल्तान झाला. याने तेलंगणचा राजपुत्र विनायकदेव याची जीभ छाटली होती आणि वेलिंगपट्टणच्या किल्ल्यावरून आगीत फेकून जिवंत जाळले होते. कर्नाटकात त्याने अदोनीजवळ सत्तर हजार माणसांची कत्ल केली.माणसे मारायची याला फार मोठी हौस होती. कर्नाटकाच्या सरहद्दिजवळ एकाच वेळी खूप मोठी कत्तल केली, काही लाख माणसे मारली. ही कत्तल इतकी मोठी होती की हा मुलुखच कित्येक वर्षे निर्मनुष्य आणि ओसाड पडला होता. अत्यंत सुंदर मंदिरे याने फोडून टाकली,आयुष्येच्या आयुष्ये खर्च करुन लिहिलेले अनमोल ग्रंथ जाळले. उध्वस्त केलेल्या मंदिरांवर अरबी भाषेत लिहिलेले शिलालेख झळकू लागले. 'बुत कदे शुद् मस्जिद' आणि 'बना कर्दे मस्जिद तबा कर कुनिश्त' अशा जाहिरनाम्यात.... याचा अर्थ असा की मूर्ती फोडून टाकून येथे ही मशीद बांधली.

पुढे त्याच्यानंतर अल्लाउद्दीन मुजाहिदशाह बहमनी तिसरा सुलतान झाला. हा गादीवर येतांच विजयानगरच्या राजाबरोबर युध्द सुरू झाले. इस १३७८ मध्ये विजयनगर साम्राज्याने बहमनी सुलतानांचा प्रचंड पराभव केला. १६ एप्रिल १३७८ रोजी सुल्तान अल्लाउद्दीन मुजाहिदशाह विजयनगरच्या राज्याने केलेला पराभव घेऊन परतत असताना त्याचा चुलता दाऊदखान याने खून करवला. यातील बहमनी सुलतानांच्या काही निर्णयांमुळे महाराष्ट्रातील काही शहरे भरभराटीस आली. आता हेच पहा, बहमनी साम्राज्यातील ९वा सुलतान महंमदशाह बहमनीने २२ सप्टेंबर १४२२ रोजी गुलबर्ग्याची राजधानी बिदरला हलवली; त्यामुळे आजच्या महाराष्ट्रातील उदगीर या शहराचे महत्व वाढून भरभराट झाली. बहमनी साम्राज्यातील क्रूरकर्मा म्हणून हुमायून बहमनीची इतिहासात ख्याती आहे. त्यामुळे त्याला जालीम असे म्हणत. त्याचा त्याच्या हुज-यांनी ४ सप्टेंबर १४६१ रोजी खून पडला.

लहान लहान हिंदु राज्ये जिंकून बहामनी राज्य वाढले होते. बहमनी साम्राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकले व नंतर त्याचीच फ़ाळणी झाली आणि विशेष म्हणजे बहमनी साम्राज्यातीलच ५ सरदारांनी बंड करून बहमनी साम्राज्याची विभागणी करून आपापसात वाटून घेतले.

य राज्याचे खालील पाच तुकडे झाले.
यूसुफ आदिलखान - विजापूर(आदिलशाही),
मलिक अहमद निजामशाहा - अहमदनगर (निजामशाही),
कुली कुतुब उल मुल्क - गोवळकोंडा (कुतुबशाही),
फ़तेउल्लाह इमादशाह- एलीचपुर (ईमादशाही) व
कासीम बेरीद - बिदर (बेरीदशाही) या नावाच्या या पाच शाह्या आपल्या ओळखीच्या आहेतच. शिवाजी महाराजांच्या काळात असलेल्या याच त्या आदिलशाही,निजामशाही, कुतुबशाही सुलतानशाह्या बहमनी साम्राज्यातून फ़ुटून निर्माण झाल्या होत्या.


https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1