2021-08-23 06:45:52
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
२३ ऑगस्ट इ.स.१६६६
( भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १५८८, संवत्सर पराभव, गुरुवार )
कवी परमानंदांना अटक :-
या दिवशी राजांनी अधिकृत दस्तके दाखवून नरवर घाटी पार केल्याचे फौलाद खानाने वकील गिरीधारीलाल याला सांगितले. मात्र दस्तके नीट न तपासण्याचा आरोप ठेवत औरंग्याने नरवरचा फौजदार ईबादुल्ला खान याची मनसब ५०० घोडेस्वारांनी कमी केली. मात्र याच दिवशी कवी परमानंद यांना दौसा येथे मोगल सैनिकांनी पकडले.
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
२३ ऑगस्ट इ.स.१६६६
आग्य्रात असताना प्रत्यक्ष औरंगजेबाच्या दरबारातील बातम्या राजांना कशा ज्ञात असत, याविषयी २३ ऑगस्ट १६६६ ला आग्य्राहून लिहिलेल्या पत्रात परकलदास लिहितो, ‘‘शिवाजी येथून निसटण्यापूर्वी चार दिवस त्याच्या भोवतालचा पहारा अधिकच कडक केला होता. पुन्हा एकदा बादशहाचा हुकूम आला होता की, शिवाजीला ठार मारा, परंतु थोडय़ाच वेळाने त्याने आपले मन बदलले व राजा विठ्ठलदासचे हवेलीत नेऊन ठेवण्याचा निर्णय घेतला. शिवाजीला दरबारांतील असल्या सर्व हालचालींची बित्तंबातमी असते. तेव्हा या बाबतींत सत्यता अजमावण्यासाठी तो कुमाराच्या छावणीत आला..’’
२३ ऑगस्ट इ.स.१६८०
(भाद्रपद शुक्ल नवमी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार सोमवार)
शिवरायांच्याच्या अकाली निधनानंतर शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी महाराज गादीवर आले. १८ जुन इ.स.१६८० ला रायगडी गेल्यावर आणि थोडी स्थिरता आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी किल्ले प्रतापगडच्या भवानी आईला १० हजार होणांची सनद करून दिली.
२३ ऑगस्ट इ.स १७७०
माधवरावांचे धाकटे बंधू नारायणराव मोठे झाले होते. नुकत्याच झालेल्या कर्नाटक मोहिमेत नारायणरावांना सहभागी करून त्यांना लढाईचे प्रत्यक्ष मैदानावरील डावपेच शिकवायला माधवरावांनी सुरुवात केली होतीच, परंतु दि. २३ ऑगस्ट सन १७७० रोजी माधवरावांनी सखारामबापू बोकील यांची दिवाणगिरी नारायणरावांना बहाल केली आणि बापूंना मुतालकीची वस्त्रे दिली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीसच नागपूरकर जानोजी भोसले माधवरावांच्या भेटीकरता पुण्यात आले. ही केवळ सदिच्छा भेट होती. माधवरावांनी सेनासाहेब सुभा असलेल्या जानोजी भोसल्यांची उत्तम सरबराई केली. मेजवान्या आणि भेटीदाखल नजराणे दिले गेले आणि ऑक्टोबर महिन्यात जानोजी परत नागपुरास फिरले. माधवरावांची तब्येत अजूनही नादुरुस्तच होती. म्हैसूरचा हैदरअली दिलेली वचने पाळत नव्हता म्हणून माधवरावांनी आपली थोडी फौज हरिपंततात्या फडक्यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा कर्नाटकात पाठवली. (अंदाजे १७७१ च्या सुरुवातीला). या फौजेने हैदरला पुन्हा हादरा देऊन ३६ लाख रुपये रोख, कर्नाटकातला इतर पूर्वी स्वराज्यात असलेला मुलुख मान्य करून घेतला. शिवाय दरसाल १४ लाख रु. खंडणी भरण्याचे हैदरला ठणकावून सांगितले. कर्नाटकात ही मोहीम सुरू असतानाच माधवरावांनी उत्तरेत असलेल्या महादजी शिंद्यांना दिल्लीवर स्वारी करण्यास सांगितले.
२३ ऑगस्ट इ.स.१७०९
बाळाजी विश्वनाथांस पेशवेपद मिळाले तेव्हा धनाजी जाधवांचा मृत्यू होऊन ५ वर्षे झाली होती (धनाजी जाधव, मृत्यू ९ जुलै १७०८); १७१० मध्ये शाहू महाराजांचा सहाय्यक परसोजी भोसले निवर्तले व त्यांचा पुत्र कान्होजी कारभारावर दाखल झाले. छत्रपती शाहू महाराजांचा मुख्य सरदार रायभानजी भोसले हे २३ ऑगस्ट १७०९ रोजी मरण पावल्यावर शाहू महाराजांची मोठी हानी झाली. यावेळी चंद्रसेन जाधव, उदाजी चव्हाण, सिधोजी, हिंदुराव घोरपडे वगैरे सरदारांची मने द्विधा होऊन शाहू राजास आपला जम बसण्याची विवंचना निर्माण झाली. ह्या सरदारांची समजूत काढण्याचा शाहू राजांनी फार प्रयत्न केला. पण ते शाहूस महाराजांस सोडून गेलेच. चंद्ररावाचा व रावरंभा निंबाळकर यांचा पंडावा मोडून आपली बाजू सावरण्यासाठी शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथांची पेशवेपदी नेमणूक केली.
२३ ऑगस्ट इ.स.१९५८
महिला समाजसुधारक चिमणाबाई सयाजीराव गायकवाड ( बडोदा ) यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
देवास येथील श्रीमंत सरदार बाजीराव अमृतराव घाटगे यांच्या पोटी जन्मलेल्या गजराबाई या युगदृष्ट्या महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दुसर्या पत्नी व राजमाता जमनाबाई राणीसाहेब यांच्या स्नुषा होत्या.चिमनाबाई राणीसाहेब व महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा विवाह सन.१८८५ मधे झाला . नेहमीच सांगितले जातेकी प्रत्येक यशस्वी पुरूषांच्या मागे एक स्री असते,त्याप्रमाणे श्रीमंत सयाजीराव महाराजांच्या मागे चिमणाबाई राणीसाहेब या भक्कमपणे ऊभ्या होत्या. महाराजांप्रमाणे चिमणाबाई या स्वप्नाळू राणी होत्या. चिमणाबाई राणीसाहेबांनी बडोद्याच्या प्रमुख महिला नेत्या म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
200 views03:45