2021-08-28 10:05:47
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
२८ आॅगस्ट इ.स.१६६७*
( भाद्रपद वद्य पंचमी, शके १५८९, संवत्सर प्लवंग, बुधवार )
मिरझाचा संशयास्पद मृत्यू
घटना घडत होत्या. राजे निसटले, रामसिंगावर आरोप, औरंग्याची नाराजी, ह्यावर मिरझा जयसिंग वैफल्यग्रस्त होता.
त्यात राजेंच्या जीवाची हमी मगितल्यामुळे संशयी औरंग्याने मिरझामुळेच राजे सुटले असा निश्चय करून घेतला आणि मिरझाचा मुन्शी उदयराज करवी बुऱ्हाणपूर येथे मुक्कामी असताना विषप्रयोगाने मृत्यू घडवून आणला.
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
२८ आॅगस्ट इ.स.१६७९
छत्रपती शिवरायांनी खांदेरी बेट जिंकले.
मुंबई बंदराच्या तोंडावर खांदेरी-उंदेरी बेटावर किल्ला बांधावयाचे योजले.त्यादृष्टीने कारागीर व मालमसाला चौलजवळ ठरवुन महाराजांनी मायनाक भंडारीला सैन्य देऊन रवाना केले. मुंबई बेटावर नियंत्रण ठेऊन शत्रूच्या आरमारी हालचालींना जरब बसणे हा या मागचा उद्देश होता. यातुन मावळ्यांच्या फौजा व इंग्रजामध्ये संघर्ष उडाला.
२८ ऑगस्ट इ.स.१६८२
सिद्दी आणि इंग्रज यांना रोखण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपले आरमार बळकट करण्यावर भर दिला होता.मराठी आरमार मायनाक भंडारीचा मुलगा,सिद्दी संबुळचा मुलगा आणि त्याचा मेव्हणा सिद्दी मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली ८५ गलबते आणि ५००० सैन्य घेऊन सिद्दीच्या आरमाराला टक्कर देण्यासाठी तयार होते.पण एवढी तयारी करून आणि इंग्रजानी धमकी देऊनही सिद्दीच्या मराठी मुलखातील कारवाया थांबल्या नव्हत्या.मुंबई बंदरात आश्रय मिळत असल्याने त्याला लगतच्या मराठी मुलखात लूटमार करणे सोपे जात होते.'त्याने मराठ्यांच्या ताब्यातील कोर्ले या गावी लूट करून ती आपल्या ताब्यातील उंदेरी बेटावर नेली होती.एवढेच नव्हे तर मराठ्यांना जरब बसवण्यासाठी त्याने नागोठणे येथे जाऊन तिथल्या नागरिकांना त्रास दिला.त्यातील बऱ्याच लोकांची नाके कापून एका हवालदाराला पकडुन त्याने मुंबईला नेले. पण संभाजीराजेच्या भीतीने इंग्रजानी त्याला त्यांना उंदेरीस नेण्यास सांगितले.
२८ ऑगस्ट इ.स.१७३३
सेखोजी आंग्रे यांचा स्मरणदिन......
शिवाजी महाराजांच्या तालमीतच तयार झालेल्या कान्होजी आंग्रे यांनी आपल्या कारकिर्दीत भारताच्या संपूर्ण पश्चिम समुद्र किनारपट्टीवर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. इ.स.१७२९ मध्ये कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या ६ मुलांपैकी ज्येष्ठ पुत्र सेखोजी उर्फ जयसिंगराव हे मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजे "सरखेल" झाले. त्यावेळी सेखोजींचे वय होते अवघे २४ वर्षे. आपल्या पित्याप्रमाणेच सेखोजी अत्यंत शूर व कडक शिस्तीचे होते. परंतु दुर्दैवाने ते अल्पायुषी ठरले.
कान्होजींच्या मृत्यूमुळे आतापर्यंत दबून राहिलेले इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी, वाडीकर सावंत व इतर स्वकीय शत्रू देखील मराठ्यांचे आरमार संपविण्यासाठी टपून बसले होते. या सर्वांशी सेखोजींनी अत्यंत चलाखीने लढा दिला. सेखोजींनी छत्रपती थोरले शाहू महाराज व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेऊन या सर्वांशी कडवी झुंज दिली. शिवाजी महाराजांपासून आपला पिढीजात वैरी असणाऱ्या सिद्दीला सेखोजींनी सळो की पळो करून सोडले. सिद्दीकडे असणारा कोकणातील बराचसा प्रांत जिंकून घेण्यात आला. स्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला त्यावेळी सिद्दीच्या ताब्यात होता. तो देखील छत्रपती, पेशवे, प्रतिनिधी व आंग्रे यांनी एकत्रीत व्यूहरचना करून जिंकून घेतला. सिद्दीच्या जंजिऱ्यावर देखील चौफेर हल्ला करण्यात आला. या सर्व मोहिमांमध्ये सेखोजी आंग्रेंसोबत त्यांचे बंधू व त्यांच्या आईने देखील हिरीरीने सहभाग घेतला होता.
सततच्या मोहीमा व दगदगीमुळे दि. २८ ऑगस्ट १७३३ रोजी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी सेखोजी आंग्रे यांचे निधन झाले. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते तर मराठ्यांचे आरमार अखंडही राहिले असते आणि बलिष्ठही झाले असते.
शिवरायांच्या काळी ज्या परकीय सत्ताधाऱ्यांकडून आपल्या जहाजांना परवानगी घ्यावी लागत असे, त्याच परकीयांना आता परवाने घेणे आंग्र्यांनी बंधनकारक केले होते. त्यामुळे चिडलेल्या यूरोपियनांनी अनेकवेळा आंग्रे व त्यांचे आरमार संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यांना कधीही शक्य झाले नाही. वास्तविक पाहता त्यावेळी इंग्रज, पोर्तुगीज, डच हे समुद्रावरील अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्याशी समुद्रावर लढा देणे, ही बाब फार कठीण होती. यामुळे हे युरोपीयन आंग्रेंना "पायरेट" (समुद्री चाचे) म्हणू लागले. आपल्याच समुद्रावर संचार करण्यासाठी या परकीयांची परवानगी घ्यावे लागणे म्हणजे एकप्रकारची गुलामगिरीच होती. आणि ती गुलामगिरी दर्याराज आंग्रेंनी साफ धुडकावून लावलेली होती.
338 views07:05