2022-05-11 14:36:41
Niharendu Dutt Majumdar And Ors. vs Emperor on 10 July, 1939 (निहारेंदु दत्त मजुमदार विरुद्ध ब्रिटनचा राजा) यांच्यातील खटल्यादरम्यान मध्यवर्ती न्यायालयाच्या असे निदर्शनास आले की, या कलमाचा गैरवापर धोकादायक ठरू शकतो आणि म्हणून त्यांनी लगोलग असे स्पष्ट केले की, टीकाकारांची मुस्कटदाबी करण्यासाठी या कलमाचा वापर केला जाऊ शकत नाही.
विशेष म्हणजे जगभरात दुसऱ्या महायुद्धाचे वारे जोरात वाहात होते किंबहुना महायुद्धाचा ज्वर उच्च टिपेला होता त्या वेळी म्हणजेच 1942 मध्ये न्यायालयाने हा निर्णय जाहीर केला....
सर मॉरिस ग्वायर यांनी स्पष्ट केले की, "भाषणादरम्यान हिंसक, टोकदार आणि बेजबाबदार भाषेचा वापर केला गेला तर तो देशद्रोह ठरू शकत नाही."
ते म्हणाले, '‘कठोर शब्दांनी हाडे मोडत नाहीत, अशा आशयाची एक म्हण इंग्रजीत आहे. विवेकी व्यक्तींना ज्या शब्दास केवळ शिवीगाळ यापलीकडे काही किंमत नाही असे वाटते तो शब्द अगदी वाच्यार्थ वा भावार्थाने प्रक्षोभक असला तरी तो कारवाईस योग्य मानण्यास सामान्य कायद्याने नेहमीच नकार दिला आहे. शिवराळ भाषा अगदी सरकारला उद्देशून असली तरी, तो देशद्रोहच असतो असे नव्हे. लोकभावनांवर आरूढ असलेले नेते असे काही शब्द आणि वाक्प्रचार पालुपदासारखे वापरत असतात, परंतु त्यांना काही अर्थच राहिलेला नाही.’'
ही समंजस व्याख्या 1947 मध्ये तत्कालीन मंत्रिपरिषदेने
(ब्रिटनचा राजा विरुद्ध सदाशिव नारायण भालेराव) [King-Emperor vs Sadashiv Narayan Bhalerao on 18 February, 1947] मागे घेतली आणि टिळक खटल्यातील न्यायाधीश स्ट्रॅची यांनी या संदर्भात मांडलेल्या संकुचित दृष्टिकोनाचा स्वीकार केला. परंतु 1962 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मध्यवर्ती न्यायालयाच्या दृष्टिकोनाची पुनस्र्थापना केली आणि कलम 124(अ) हे घटनेच्या 19(1)(अ) या कलमाखाली असलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे उल्लंघन करत नाही, असे निसंदिग्ध शब्दांत स्पष्ट केले. हिंसेला उत्तेजन देणाऱ्या किंवा जनजीवन विस्कळीत होईल अशा प्रकारचे उद्दिष्ट राखणाऱ्या अथवा कायदा-सुव्यवस्थेत अडथळा निर्माण करणाऱ्या कृतींसाठीच हे कलम लागू आहे.
(केदारनाथ सिंग विरुद्ध बिहार राज्य, 1962)इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी, दोन व्यक्तींनी ‘खलिस्तान जिंदाबाद’ आणि ‘राज करेगा खालसा’, या घोषणा दिल्या. परंतु सर्वोच्च न्यायालयाने, काही वेळ काही घोषणा दिल्याने, ज्याला कोणताही प्रतिसाद मिळत नाही आणि ज्यातून कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही, त्यास कलम 124(अ) लागू होऊ शकत नाही, असे सांगत आरोपींना दोषमुक्त केले. न्यायालयाने या वेळी योग्य असे निरीक्षण मांडले, ज्यात त्यांनी म्हटले की, काहीवेळा काहींची अटक, जोरजोरात घोषणा देण्याऐवजी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू शकते आणि सावध केले की, अतिसंवेदनशीलपणा कधी कधी अंगावर येऊ शकतो.
खरोखर, 124(अ) संदर्भातील स्पष्टीकरणे हे स्पष्ट करतात की, सरकारवरील टीका किंवा सरकारच्या कृतीबाबत नापसंती, नाराजी व्यक्त करणे म्हणजे देशद्रोह नव्हे...
देशाच्या विधि आयोगाने कलम 124(अ) चा काळजीपूर्वक पुनर्आढावा घेतला आहे. 1971 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या 42व्या अहवालात त्यांनी या कलमाचा विस्तार भारतीय राज्यघटना, संसद आणि विधानसभा व न्यायप्रशासन यांच्याप्रती तिरस्कार निर्माण करू पाहणाऱ्यांपर्यंत वाढवावा, असे नमूद केले होते. तसेच शिक्षेचा कालावधी 7 वर्षांपर्यंत कमी करण्यात यावा, अशी इच्छाही या अहवालात नमूद करण्यात आली होती. शिक्षेचा कालावधी 7 वर्षांपर्यंत कमी करता येऊ शकतो, मात्र व्याख्येची व्याप्ती वाढवण्याचे काहीही कारण नाही. विद्यमान कलम काळाच्या ओघात कठीण प्रसंगांतही टिकून राहिले आहे आणि न्यायालयांनी हिंसेला आमंत्रण देणाऱ्या किंवा मोठय़ा प्रमाणावर कायदा व सुव्यवस्थेत अडचणी निर्माण करणाऱ्या गंभीर कृत्यांपर्यंतच हे कलम लागू करण्यापर्यंत त्याची व्याप्ती ठेवली आहे(होती )...!!!
__
https://t.me/PSI_MPSC
254 viewsedited 11:36