2023-03-15 13:39:24
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
१५ मार्च इ.स.१६६५
(शुद्ध नवमी, शके १५८७, विश्वावसू, वार बुधवार)
मिर्झाराजे जयसिंग पुण्याहून लोणी काळभोर येथे दाखल!
जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला. त्याने पुरंदरचा पायथा गाठला व गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला (३१ मार्च १६६५) जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले.
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link
१५ मार्च इ.स.१६७०
माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली .
१५ मार्च इ.स.१६८०
(फाल्गुन वद्य दशमी, शके १६०१, सिद्धार्थी, वार सोमवार)
युवराज राजाराम महाराजांचे विवाह!
७ मार्च इ.स.१६८० युवराज राजाराम महाराज यांची मुंज उरकली. आणि लगेच युवराज राजाराम महाराजांचे विवाह महापराक्रमी सरनौबत के. प्रतापराव गुजर (कुडतोजी गुजर) यांच्या कन्नेशी, म्हणजेच जानकीबाई साहेबांशी विवाह सोहळा पार पडला. परंतु या सोहळ्यावर एक विषण्य छाया पडलेली होती. युवराज शंभुराजे अर्थात युवराज राजाराम महाराजांचे ज्येष्ठ बंधू या सोहळ्यास उपस्थित नव्हते.
१५ मार्च इ.स.१७१९
छत्रपती शाहुंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.
१५ मार्च इ.स.१७६०
सदाशिवराव भाऊनीच उत्तर हिंदुस्थानात स्वारीस जावे असे पेशवे मंडळात ठरल्यावर भाऊ पडदूराहून १४ मार्च रोजी निघाले व १५ मार्च
रोजी शिंदखेडास येऊन डेरेदाखल झाले.
१५ मार्च इ.स.१७७९
शपथक्रिया - महादजी शिंदे आणि नाना फडणवीस यांची
एखाद्या कार्यात दुसऱ्याच्या सोबतीने पुढे जाताना महत्वाचा असतो तो 'विश्वास' . दुसऱ्याच्या मनात काही काळंबेरं असेल तर त्याचा फटका दोघांनाही बसणार,अशा वेळी एकमेकांवरचा विश्वास दृढ व्हावा यासाठी तुळशीपत्र - बेलबंढारा देऊन 'बंधुत्वाची शपथ' घेतली जाई.
१५ मार्च १७७९ रोजीच्या पात्रातला हा उल्लेख पहा,
महादजी लिहतात : सरदारी माझी - फडनवीशी त्याची (नानाची), बंधुत्वाप्रमाणे वर्तन करू, ज्यात सरदारीचे कल्याण ते संधान चालवू, जो अनिष्ट चिंतील त्याचे पारिपत्य करू. आम्ही बेलबंढारा पाठवला आहे. आपण बंधुत्वाविषयी संशय न मानावा. आपण आहा तेथे मी आहे.
१५ मार्च इ.स.१८१७
बाजीरावा (दुसरे) पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेस त्रिंबकजींचा बंदोबस्त करण्यास सांगितले. गोखले नीरेहून परत आले आणि त्यांनी त्रिंबकजींच्या काहीच हालचाली नीरेच्या काठी नाहीत असे पेशव्यास सांगितले हे वृत्त एल्फिन्स्टनला कळविले गेले तेव्हा एल्फिन्स्टनने बाजीरावांची नीती ओळखली आणि बाजीरावांची भेट घेऊन त्यांस बजाऊन सांगितले की “त्रिंबकजींस आम्ही पकडू पण तुमची त्याजला आतून फूस आहे, ती बंद करा. तसेच तुम्ही फौजा जमवून जी लष्करी तयारी करीत आहात तीही लगेच बंद करा”. त्यावर बाजीरावाने अत्यंत कांगावा केला. मी इग्रज सरकारची मर्जी सांभाळण्यात इतका तत्पर असता मजवर हे नसते कुभांड रचण्यात येत आहे”, अशी त्याने बतावणी केली पण त्याचा परिणाम
एल्फिन्स्टनच्या मनावर न होता त्यान दिनाक १५ मार्च १८१७ रोजी कर्नल स्मिथला सैन्यासह पुण्यावर
चालून जाण्यास सांगितल. तसेच गव्हर्नर जनरलला खलिता पाठवून बाजीरावांविरुद्ध उघडपणे युद्ध
पूकारण्याची परवानगी मागितली. पण पुढे याचे रूपांतर तहात झाले गेले.
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर
159 views10:39