2023-03-22 09:19:03
आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
२२ मार्च इ.स.१६६६
पोर्तुगीज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल आंतोनियू द मेलू द काश्त्रू याने सल्लागार मंडळाची बैठक बोलावली. इ.स.१६६६ रोजीच्या मार्च महिन्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरच्या ताब्यात असलेल्या फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. तो लढविण्यासाठी अंत्रूज महालातील विजापुरच्या अंकीत असलेल्या मोकासदार देसायांनी पोर्तुगिजांकडे दारुगोळ्यांची आणि शस्त्रांस्त्रांची मदत मागितली. देसायांच्या विनंतीचा विचार करण्यासाठी पोर्तुगीज हिंदुस्थानचा कॅप्टन जनरल आंतोनियू द मेलू द काश्त्रू याने राज्य सल्लागार मंडळाची बैठक बोलावली.
https://www.instagram.com/the_great_maratha_warriors/
https://wa.me/message/Y2WBK2HSVXL5I1
शिव दिनविशेष Video Link
२२ मार्च इ.स.१६७४
( फाल्गुन वद्य एकादशी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, रविवार )
आनंदराव काकांचे बेहलोलला सडेतोड उत्तर :-
सरनौबत प्रतापराव गुजर काका आणि ६ शूर मावळे शिवरायांच्या शब्दाखातर स्वराज्यासाठी प्राण गमावून बसले. ही बातमी आनंदरावांनी महाराजांना कळवली आणि दिलासा दिला की " सेनापती पडले तरी राग न धरणे, त्यांच्या जागी मी आहे ". महाराजांना आता प्रश्न पडला की, सरनौबत कोण करावा? आलेल्या पत्रांस महाराजांनी आनंदरावांना उत्तर दिले की, " आपण तूर्त त्यांच्या वेतनावर काम करावे. मात्र शत्रूची याद राखावी ".महाराजांच्या आज्ञेने आनंदराव काकांची हुरूप वाढली. हेरांकरवी माहिती काढत काकांनी गनिमी कावा वापरून बेहलोलच्या मुलखात घुसून त्राही माजवली. आनंदराव काका सरळ कानडी मुलखात घुसले. बांकापूरपासून २५ मैलांवर पेंच गावावर स्वारी करून संपत्ती प्राप्त केली. त्यानंतर संपगावचे संपन्न पेठेवरही स्वारी करू धनसंपत्ती प्राप्त केली.
३००० बैल लागले ही संपत्ती स्वराज्यात आणायला.
२२ मार्च इ.स.१६८०
महाराजांना ज्वराची बाधा!
सूर्यग्रहण आटोपले. आणि त्यानंतर दोनच दिवसांनी महाराजांना ज्वराची बाधा जानवू लागली. महाराजांचे राजवैद्य मोरेश्वर पंडीतराव शर्थ करीत होते. हकीम उपचारांची पराकाष्ठा करत होते. मात्र एकाएकी महिराजांची प्रक्रृती घसरणीसच लागली. किल्ले रायगडावर यावेळी महाराणी सोयराबाईसाहेब, युवराज राजाराम महाराज, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य, राहूजी सोमनाथ, हीरोजी फर्जंद, सुर्याजी मालुसरे, मोरोपंत पेशव्यांचे चिरंजीव निळोपंत आदी मुत्सद्दी हजर होते.
२२ मार्च इ.स.१६८२
(आधिक चैत्र वद्य नवमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार बुधवार)
तब्बल पाच वर्षे मराठ्यांची झुंज!
औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.
त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे उधळून लावले.
किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले रामसेजच्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले
इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले.
131 views06:19