काल आंदोलन कशासाठी केलं,आणि बातमी कशा बद्दल आली...??
आंदोलन करणाऱ्या उमेदवारांच्या मागण्या
काल एमपीएससी मुलांचा आंदोलन अलका टॉकीज चौकात झालं होतं त्यासंबंधीची बातमी सकाळ मिडियाने प्रसिद्ध केली त्यातून चुकीचा मेसेज गेला आहे.
1) मुळात हे आंदोलन परीक्षा लवकरात लवकर घेण्यात यावी यासाठी आहे.
2) यात चुकीची उत्तरे बदलून देण्यात यावीत अशी कोणतीही मागणी नाही, उलट दोन चार मुलं गेले सहा महिने हायकोर्ट च्या माध्यमातून परीक्षा होऊ देत नाहीत.
3) 13000मुख्य परीक्षा पात्र विद्यार्थ्यांचे हे आंदोलन आहे, स्पष्ट मागणी ही आहे की लवकरात लवकर परीक्षा घेण्यासाठी आयोगाने प्रयत्न करावेत. आम्हाला कोणत्याही प्रकारची उत्तरे बदलून नको आहेत.
4) जे आहेत तसं आयोगाने लवकरात लवकर परीक्षा कण्डक्ट करावी.