Get Mystery Box with random crypto!

मराठी साहित्य UPSC

टेलीग्राम चैनल का लोगो marathii — मराठी साहित्य UPSC
टेलीग्राम चैनल का लोगो marathii — मराठी साहित्य UPSC
चैनल का पता: @marathii
श्रेणियाँ: शिक्षा
भाषा: हिंदी
ग्राहकों: 9.15K
चैनल से विवरण

Upsc मुख्य परीक्षेला असणाऱ्या मराठी साहित्य या ऐच्छिक विषया संबधी सर्व माहिती, पेपर मधले लेख या चॅनेल वर पोस्ट केले जातील. आपला विवेक पाटील "उमाई"अकॅडमी पुणे ९८२२०७३५९९.

Ratings & Reviews

3.00

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

0

3 stars

0

2 stars

0

1 stars

1


नवीनतम संदेश 17

2020-08-28 14:28:11
28.3K viewsVivek Patil, 11:28
ओपन / कमेंट
2020-08-28 14:27:07
24.4K viewsVivek Patil, 11:27
ओपन / कमेंट
2020-08-21 12:29:03
21.4K viewsVivek Patil, 09:29
ओपन / कमेंट
2020-07-31 09:54:46
27.8K viewsVivek Patil, 06:54
ओपन / कमेंट
2020-07-26 20:35:25 ‘माझ्या हातून मूठभर माती अवकाशावर पडे’ अशी विलक्षण हातोटी साधणाऱ्या ग्रेसांचा काव्य़ मतितार्थ अनेकदा तर्काचीही कसोटी बघतो. पुढच्याच ओळीत ते म्हणतात, घराघरांना मरण फुलांची गंधित भूल जडे. या शब्दकळेतून त्यांना काय सांगायचे आहे हे प्रत्येकाला कळेलच असे नाही. ही आकाशावर उधळल्या गेलेली मातीच्या गंधित असोशीतून कसेसोडवून घ्यायचे ते प्रत्येकाने ठरवायचे. ग्रेसांचे लिंपण-शिंपण कळायला पुढची दोन दशके लागतील. ग्रेस निरर्थक होते, हे त्यांचा शत्रूदेखील म्हणू शकणार नाही. त्यांच्या कवितेतील देखण्या सार्थकतेने अनेकांना लुब्ध केले. अर्थात, आपआपल्या भिन्न अर्थप्रवाहानुसार. ग्रेसांची कविता गुंतवून ठेवते हे म्हणायचे ते त्यातूनच. प्रत्येकाला नेमका असा एक अर्थ पटेल असे मुळीच नाही. आपण मात्र आपल्या परीने कधी खांबासारखे तर कधी सुपासारखे आंधळ्यांचे गजवर्णन सुरू ठेवायचे. मनामनांना विचारांच्या नवप्रवाहात गुंतवणाऱ्या या महाकवीला अभिवादन.

Join @marathii
Vivek Patil
25.5K viewsVivek Patil, 17:35
ओपन / कमेंट
2020-07-26 20:35:25 ग्रेस- एक गुंतवणूक !
ग्रेस यांचा जन्मदिन दोन दिवसांपूर्वी झाला. सोशल मिडियावरून ग्रेस यांचा काव्यजागर सुरु होता. “चंद्रमाधवीचे प्रदेश” मधील ‘अर्थविपर्यासाचे उखाणे’ नव्याने आठवून गेले. ग्रेसांच्या इतर कवितांसारखाच या सफरीचाही सहज माग काढणे जिकरीचेच. अनेकांना अगम्य आणि दुर्बोध भासणारा हा कवी बरेचदा अंतर्मुख करणारा आणि कधीमधी पुरता भन्नाट देखील वाटतो. ग्रेसांची कविता खिळवून ठेवत नाही, ती गुंतवून ठेवते. म्हणजे ती ऐकल्यावर किंवा वाचल्यावर आपण निव्वळ स्तब्ध होत नाही

अर्थप्रवाहातून आपण स्वतःला खणू लागतो. साऱ्याच ओळींचा अर्थ पारदर्शी नसतो. प्रत्येकाला उमगेल अशी आरस्पानी वाट नाहीच त्यांच्या काव्याची. अर्थासंदर्भात असे असावे की तसे हे व्दंव्द मनाला झिणझिण्या आणते. ही ग्रेसांच्या कवितेची खरी नजाकत आहे. त्यांच्या ” बाहुलीचे न्हाण कधी ” या कवितेचा शोध घेताना अक्षरशः तर्काची पातळी अंतराळापर्यंत नेली तरी काही गृहितके अनुत्तरीतच राहतात. हाती काहीतरी लागावे याचा थोडाफार प्रयत्न केला तर जे गवसते ते अफाट असते. शेवटी काय तर स्वचिंतेत झालेली वाढ हाती येते…काय म्हणतात ग्रेस एकेका ओळीमधून बघुयात…
बाहुलीचे न्हाण कधी, खरे मानू नये
साडीचोळी अपुली ग, सांभाळावी बये…….
स्त्रीच्या वेदनांना अंत नसतो. कोणत्याही आईसाठी आपली मुलगी बाहुलीच असते. पण ती कायम भातुकलीतच वावरेल असे समजू नये. तिचं शहाणं होणं म्हणजेच स्त्रीत्वातील पदार्पण चिंतीत करणारेच. म्हणून तू जपून, सांभाळून रहा असा गर्भितार्थ या ओळीत दडला असावा.
अंबारीचा हत्ती नसे, अंबराचा स्वामी
लक्ष्मणाची रेघ आली, उर्मिलेच्या कामी
स्त्रीने कितीही खंबीरपणे म्हणजे अगदी हत्तीसारखी पावले टाकायची म्हटली तरी आभाळाची म्हणजेच संसाराची पूर्ण ‘मालकी’ समाज स्त्रीकडे कधीच सोपवित नाही. उलट तिची कुचंबणाच केली जाते. लक्ष्मणरेषा जिच्यासाठी आखली त्या सीतेने ती भलेही पार केली (पुढे तिच्याही वाट्याला कुचाळकीच आली) मात्र परंपरेचे जोखड घेऊन वावरणाऱ्या उर्मिलेला संबंध आयुष्य रेषेआड एकट्यात काढावे लागले. ‘लक्ष्मणाची रेघ आली, उर्मिलेच्या कामी’ या ओळीतून ही खंत, घुसमट ग्रेसांनी नेमकेपणे पकडली आहे.
अनसूयेलाही बाई, कधी होतो जाच
देवदत्त वृक्षापुढे, मांडतांना पेच
तीन देवींच्या इर्षेतून अनुसूयेच्या वाट्याला नग्नभोग आले होते. त्याचेही अंतिम लक्ष्य होते तिचे (सीतेसारखेच) पतिव्रतत्व सिद्ध करणे. देवदत्त वृक्षाची संकल्पना करून दंतकथेतील भोजन-पेच ग्रेसांनी समर्थपणे “वाढला” आहे. चाकोरीबद्ध जगण्यातील या जाचालाच परंपरा लगडत चालल्या असताना ग्रेसांचे शब्द अंगावर काटा आणल्याशिवाय राहत नाही. पतिव्रतेच्या दुःखालाही अंतरंगातील डागण्या सहन कराव्या लागतात हा विचार यातून पुढे येतो.
शरीराचे देणे घेणे, त्याचे द्यावे दान
पायाखाली फुले येतां, उपटावे तण
निसर्गाने दिलेले शारीरिक त्रास स्त्रीनेच काय म्हणून भोगायचे ? हे दुखणे दानात देऊन टाकता आले तर किती छान झाले असते ? पण तसे होणे नाही. आजवर चिरडलेल्या अशा फुलांना नवे स्वातंत्र्य द्यायचे असेल तर जुनाट परंपरांचे तण उपटण्याचे कर्तव्य स्वतःलाच पार पाडावे लागेल, असे प्रतिकात्मक आवाहन या कडव्यातून ग्रेसांनी धारिष्ट्याने केलेले दिसते. या पुढील कडवे तर अधिक खोल रुतणारे आहे.
देवाच्याही गावामध्ये, वेताळाचा पार
घुबडाच्या डोळ्यालाही, कारूण्याची धार
कितीही सोज्ज्वळता चिकटवली तरी पारावरच्या गप्पांमध्ये स्त्री आली की देवत्व नव्हे तर लोकांमधील वेताळच जागा होतो. स्त्रीमधील हे कारुण्य कोण टिपणार ? अहो, अशुभाचे टोक समजले जाणाऱ्या घुबडाच्या डोळ्यातील कारुण्य शोधायला हवे. वेदनेची सफर घडविताना हा महाकवी चपखलपणे लक्ष्मीचे वाहन उपयोगात आणतो, हे महत्त्वाचे. कुरुपतेतील कारुण्याला हात घालायचा असेल तर कवीचे ह्रदयही तेवढेच कनवाळू हवे हा दाखला या कडव्यातून मिळतो.
हडळीचा दिवा तेथे, फुंकू नये त्याला
असे जाता जाता भेटे, गंगा शंकराला
लक्ष्मी म्हणजे संस्कृती. हडळ म्हणजे विकृती. हडळ येते म्हणून दिवा लावावा अशी संस्कृती आहे. दिव्यांमुळे हडळीतील दुष्प्रवृत्ती निरुपयोगी ठरेल. ग्रेसांना कदाचित हडळीतलेही स्त्रीत्व तर दिसले नसावे ? दिवा फुंकू नका असे आवाहन करून सांजेला एकप्रकारे स्त्रीत्वाचे रुप असलेल्या हडळीलाही न थोपविण्याचा आग्रह ते करीत असावेत. स्त्रीत्वाला थोपविणे ही विकृती नव्हे काय, असाही अर्थ त्यांना अभिप्रेत असावा. हडळ म्हणजे वैचारिक साचलेपण ठरविले तर प्रवाहाचे प्रतीक म्हणजे गंगा. शंकराच्या जटेतून मुक्त होऊन ती पथ्वीवर आली. पण शेवटी जटेतच परतली असे सत्य देवकथांमधून पुढे येते. म्हणजेच, स्त्री कधीच मुक्त होऊ शकत नाही…आणि पुरती व्यक्तही होऊ शकत नाही, असा सुरेख अर्थ या कवितेतून गवसतो.
ग्रेसांचा अत्यूच्च टोकाच्या प्रतिमावादाची प्रत्येकालाच भुरळ पडते.
21.5K viewsVivek Patil, 17:35
ओपन / कमेंट
2020-07-26 20:34:13
17.3K viewsVivek Patil, 17:34
ओपन / कमेंट
2020-07-25 20:47:56
18.1K viewsVivek Patil, 17:47
ओपन / कमेंट
2020-07-25 20:46:10 Join @marathii
16.7K viewsVivek Patil, 17:46
ओपन / कमेंट
2020-07-25 20:44:34
16.7K viewsVivek Patil, 17:44
ओपन / कमेंट