Get Mystery Box with random crypto!

*उष्ण लाटेने विदर्भ होरपळला* सौजन्य : अॅग्राेवन दिनांक : 0 | कृषिक अँप Krushik app

*उष्ण लाटेने विदर्भ होरपळला*

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 04-Jun-22
पुणे : मॉन्सूनचे) आगमन काही दिवसांवर आले असतानाच, राज्यात उन्हाच्या चटक्याने काहिली वाढली आहे. उष्ण लाटेने विदर्भ अक्षरशः होरपळून निघाला आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे देशातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथेही उष्ण लाट होती. आज (ता. ४) विदर्भात उष्ण लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी, वर्धा, नागपूर येथे तापमानाचा पारा ४५ अंशांच्या वर सरकला होता. विदर्भात कमाल तापमान ३९ ते ४७ अंश, मराठवाड्यात ४० ते ४२ अंश, मध्य महाराष्ट्रात २८ ते ३९ अंश, तर कोकणात ३२ ते ३४ अंशांच्या आसपास होते. आज (ता. ४) उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांपासून नागालॅण्डपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा पूर्व-पश्‍चिम सक्रिय आहे. पश्‍चिम बंगालपासून आंध्र प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. तर ओडिशा किनारपट्टीलगत समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. या शिवाय अंदमान समुद्र आणि श्रीलंकेजवळ देखील चक्राकार वाऱ्यांच्या स्थिती आहेत.
शुक्रवारी (ता. ३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.७, नगर ४०.२, धुळे ४१, जळगाव ४२.२, कोल्हापूर ३५.३, महाबळेश्‍वर २८.७, नाशिक ३६.२, निफाड ३६.६, सांगली ३७.३, सातारा ३६.७, सोलापूर ३९.४, सांताक्रूझ ३४.८, डहाणू ३३.६, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.२, परभणी ४२.७, नांदेड ४०.८, अकोला ४३.३, अमरावती ४४.०, बुलडाणा ३९.४, ब्रह्मपुरी ४५.३, चंद्रपूर ४६.८, गोंदिया ४४.८, नागपूर ४५, वाशीम ४१.५, वर्धा ४५.४, यवतमाळ ४३.७
राज्यात शुक्रवारी सकाळी आठपर्यंत पाऊस मिलिमीटरमध्ये ः सिंधुदुर्ग ः रामेश्‍वर ९०, वैभववाडी ५०, कोल्हापूर ः शिरोळ ५०, कोल्हापूर ४०, गगनबावडा व पन्हाळा प्रत्येकी ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सांगलीच्या कसबे डिग्रजला ३० मिलिमीटर पाऊस पडला.
मॉन्सूनने ईशान्य भारत व्यापला : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) गोव्याच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत. मात्र पुढील वाटचालीस पोषक हवामान नसल्याने अरबी समुद्रावरून मॉन्सूनची प्रगती थांबली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मॉन्सूनच्या आगमनासाठी वाट पाहावी लागणार आहे. बंगालच्या उपसागरावरून मात्र मॉन्सूनची आगेकूच सुरू असून, संपूर्ण ईशान्य भारत व्यापून, सिक्कीम आणि पश्‍चिम बंगाल राज्याच्या काही भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :
विदर्भ : वर्धा, चंद्रपूर, गोंदिया
*अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.*
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en