2021-02-02 21:48:40
दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड
डलहौसीने
दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.
या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो.
1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.
या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये.
मांडवी राज्य :- 1839
कुलाबा व जालौर :- 1840
सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842
व्यपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.
डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.
सातारा :- 1848
जैतपूर व संबलपूर :- 1849
पंजाब :- 1849
ओरछा :- 1849
भागत /बघाट :- 1850
उदयपूर :- 1852
झांसी :- 1853
नागपूर :- 1854
करौली :- 1855
इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला.
इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.
इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली.
इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले.
इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले.
पेशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला.
कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली.
बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.
History notes by puri bhausaheb
417 views18:48